शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

कर्जाऐवजी साखरेला अनुदान देणे गरजेचे

By admin | Updated: December 24, 2015 23:35 IST

संगमनेर : साखर कारखानदारी सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे अडचणीत सापडली आहे.

संगमनेर : साखर कारखानदारी सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे अडचणीत सापडली आहे. ३ हजार ५०० रुपये उसाला भाव मिळाल्याशिवाय एफआरपीप्रमाणे भाव देणे शक्य नाही. त्यामुळे कारखान्यांना बिनव्याजी कर्जाऐवजी साखरेला अनुदान देण्याची मागणी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केली. रविवारी खराडी येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर होते. व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँक अध्यक्ष सीताराम गायकर, उपाध्यक्ष रामदास वाघ, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, अ‍ॅड. माधव कानवडे, शिवाजी थोरात, रणजीत देशमुख, शंकर खेमनर, रावसाहेब नवले आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले, सहकार हा गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी आहे. निकोप सहकारामुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळाली आहे. खराडी हे विकासाच्या पाठिशी उभे राहणारे गाव आहे. निवडून आल्यावर गळ्यात पडणारे हार हे जनतेच्या अपेक्षांचे असतात. त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगून सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये बहुमताने विजयी केल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. गायकर यांनी थोरातांमुळे जिल्हा बँकेत काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगत यापुढे दूध व्यवसायाला बँक मदत करणार असल्याचे स्पष्ट केले. खेमनर, तांबे, देशमुख, कानवडे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक वाघ यांनी केले. कार्यक्रमास भाऊसाहेब कुटे, लक्ष्मण कुटे, लहानुभाऊ गुंजाळ, मीनाक्षी थोरात, पूनम माळी, रोहिणी गुंजाळ, अण्णा राहिंज, अ‍ॅड. नानासाहेब गुंजाळ, रावसाहेब वर्पे, अ‍ॅड. मधुकर गुंजाळ, गणपत सांगळे, अशोक खेमनर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश गुंजाळ यांनी करून नाना वाघ यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)