शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

कर्जाऐवजी साखरेला अनुदान देणे गरजेचे

By admin | Updated: December 24, 2015 23:35 IST

संगमनेर : साखर कारखानदारी सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे अडचणीत सापडली आहे.

संगमनेर : साखर कारखानदारी सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे अडचणीत सापडली आहे. ३ हजार ५०० रुपये उसाला भाव मिळाल्याशिवाय एफआरपीप्रमाणे भाव देणे शक्य नाही. त्यामुळे कारखान्यांना बिनव्याजी कर्जाऐवजी साखरेला अनुदान देण्याची मागणी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केली. रविवारी खराडी येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर होते. व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँक अध्यक्ष सीताराम गायकर, उपाध्यक्ष रामदास वाघ, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, अ‍ॅड. माधव कानवडे, शिवाजी थोरात, रणजीत देशमुख, शंकर खेमनर, रावसाहेब नवले आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले, सहकार हा गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी आहे. निकोप सहकारामुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळाली आहे. खराडी हे विकासाच्या पाठिशी उभे राहणारे गाव आहे. निवडून आल्यावर गळ्यात पडणारे हार हे जनतेच्या अपेक्षांचे असतात. त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगून सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये बहुमताने विजयी केल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. गायकर यांनी थोरातांमुळे जिल्हा बँकेत काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगत यापुढे दूध व्यवसायाला बँक मदत करणार असल्याचे स्पष्ट केले. खेमनर, तांबे, देशमुख, कानवडे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक वाघ यांनी केले. कार्यक्रमास भाऊसाहेब कुटे, लक्ष्मण कुटे, लहानुभाऊ गुंजाळ, मीनाक्षी थोरात, पूनम माळी, रोहिणी गुंजाळ, अण्णा राहिंज, अ‍ॅड. नानासाहेब गुंजाळ, रावसाहेब वर्पे, अ‍ॅड. मधुकर गुंजाळ, गणपत सांगळे, अशोक खेमनर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश गुंजाळ यांनी करून नाना वाघ यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)