शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

साखर विक्रीची चौकशी करणार- सदाभाऊ खोत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 20:23 IST

शिर्डी : यंदा साखरेचे उत्पादन पुरेसे आहे. काही कारखानदार व दलाल साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याने तात्पुरते भाव ...

शिर्डी: यंदा साखरेचे उत्पादन पुरेसे आहे. काही कारखानदार व दलाल साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याने तात्पुरते भाव पडले आहेत. आठ पंधरा दिवस कारखानदारांनी साखर विक्री बंद करावी, असा सल्ला सोमवारी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. तसेच या काळातील साखर विक्रीची चौकशी करण्यात येईल, असे सांगत कारखान्यांनी एफआरपी दिला नाही तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.शिर्डीच्या सरकारी विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. या सरकारच्या कृषीविषयक धोरणांवर आपण पूर्ण समाधानी आहात का? याचे उत्तर देताना खोत यांना बरीच कसरत करावी लागली. थेट उत्तर देण्याऐवजी गेल्या पंधरा वर्षाच्या तुलनेत या सरकारची कामगिरी समाधानकारक असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले़ यासाठी अनेक दाखले देतानाच हे सरकार शेतकºयांचेच आहे, असा दावाही त्यांनी केला. यावेळी डॉ़ राजेंद्र पिपाडा, श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती दीपक पटारे आदींसह शेतकरी नेत्यांची उपस्थिती होती़शेतकरी कर्जमाफीबाबत बोलतांना खोत यांनी आमचे लबाडाचे आवतनं नाही, आम्ही जेवणच दिल़े पंधरा वर्षे तुमचे सरकार असताना का कर्जमाफी का देऊ शकला नाही?, पंधरा वर्षे ज्यांनी डल्ला मारला ते आता हल्लाबोलच्या माध्यमातून कोल्हेकुई करीत आहेत, या शब्दात त्यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी केलेल्या आरोपांचा व विरोधकांच्या हल्लाबोल आंदोलनाचा समाचार घेतला़ निवडणुकीच्या तोंडावर वीज देण्याचे आश्वासन देऊन निवडणुकीनंतर बिले वसूल केल्याची आठवणही खोत यांनी करून दिली़ २००८ च्या कर्जमाफीच्या तुलनेत चारपट अधिक कर्जमाफी दिल्याचा दावाही त्यांनी केला़दिवंगत यशवंतराव, वसंतदादा यांच्या नंतर शेतकºयांचा कळवळा असलेला मुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करीत फडणवीसांनी देशमुख, पवारांची मक्तेदारी मोडीत काढली म्हणून मगरीचे अश्रू सुरू आहेत़ पण फडणवीस आपला कार्यकाल पूर्ण करतील. त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन निवडणूक जिंकू, असा विश्वास कृषी राज्यमंत्री खोत यांनी शिर्डीत व्यक्त केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSadabhau Khotसदाभाउ खोत shirdiशिर्डी