शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

साखर विक्रीची चौकशी करणार- सदाभाऊ खोत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 20:23 IST

शिर्डी : यंदा साखरेचे उत्पादन पुरेसे आहे. काही कारखानदार व दलाल साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याने तात्पुरते भाव ...

शिर्डी: यंदा साखरेचे उत्पादन पुरेसे आहे. काही कारखानदार व दलाल साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याने तात्पुरते भाव पडले आहेत. आठ पंधरा दिवस कारखानदारांनी साखर विक्री बंद करावी, असा सल्ला सोमवारी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. तसेच या काळातील साखर विक्रीची चौकशी करण्यात येईल, असे सांगत कारखान्यांनी एफआरपी दिला नाही तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.शिर्डीच्या सरकारी विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. या सरकारच्या कृषीविषयक धोरणांवर आपण पूर्ण समाधानी आहात का? याचे उत्तर देताना खोत यांना बरीच कसरत करावी लागली. थेट उत्तर देण्याऐवजी गेल्या पंधरा वर्षाच्या तुलनेत या सरकारची कामगिरी समाधानकारक असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले़ यासाठी अनेक दाखले देतानाच हे सरकार शेतकºयांचेच आहे, असा दावाही त्यांनी केला. यावेळी डॉ़ राजेंद्र पिपाडा, श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती दीपक पटारे आदींसह शेतकरी नेत्यांची उपस्थिती होती़शेतकरी कर्जमाफीबाबत बोलतांना खोत यांनी आमचे लबाडाचे आवतनं नाही, आम्ही जेवणच दिल़े पंधरा वर्षे तुमचे सरकार असताना का कर्जमाफी का देऊ शकला नाही?, पंधरा वर्षे ज्यांनी डल्ला मारला ते आता हल्लाबोलच्या माध्यमातून कोल्हेकुई करीत आहेत, या शब्दात त्यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी केलेल्या आरोपांचा व विरोधकांच्या हल्लाबोल आंदोलनाचा समाचार घेतला़ निवडणुकीच्या तोंडावर वीज देण्याचे आश्वासन देऊन निवडणुकीनंतर बिले वसूल केल्याची आठवणही खोत यांनी करून दिली़ २००८ च्या कर्जमाफीच्या तुलनेत चारपट अधिक कर्जमाफी दिल्याचा दावाही त्यांनी केला़दिवंगत यशवंतराव, वसंतदादा यांच्या नंतर शेतकºयांचा कळवळा असलेला मुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करीत फडणवीसांनी देशमुख, पवारांची मक्तेदारी मोडीत काढली म्हणून मगरीचे अश्रू सुरू आहेत़ पण फडणवीस आपला कार्यकाल पूर्ण करतील. त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन निवडणूक जिंकू, असा विश्वास कृषी राज्यमंत्री खोत यांनी शिर्डीत व्यक्त केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSadabhau Khotसदाभाउ खोत shirdiशिर्डी