शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

साखर विक्रीची चौकशी करणार- सदाभाऊ खोत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 20:23 IST

शिर्डी : यंदा साखरेचे उत्पादन पुरेसे आहे. काही कारखानदार व दलाल साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याने तात्पुरते भाव ...

शिर्डी: यंदा साखरेचे उत्पादन पुरेसे आहे. काही कारखानदार व दलाल साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याने तात्पुरते भाव पडले आहेत. आठ पंधरा दिवस कारखानदारांनी साखर विक्री बंद करावी, असा सल्ला सोमवारी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. तसेच या काळातील साखर विक्रीची चौकशी करण्यात येईल, असे सांगत कारखान्यांनी एफआरपी दिला नाही तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.शिर्डीच्या सरकारी विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. या सरकारच्या कृषीविषयक धोरणांवर आपण पूर्ण समाधानी आहात का? याचे उत्तर देताना खोत यांना बरीच कसरत करावी लागली. थेट उत्तर देण्याऐवजी गेल्या पंधरा वर्षाच्या तुलनेत या सरकारची कामगिरी समाधानकारक असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले़ यासाठी अनेक दाखले देतानाच हे सरकार शेतकºयांचेच आहे, असा दावाही त्यांनी केला. यावेळी डॉ़ राजेंद्र पिपाडा, श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती दीपक पटारे आदींसह शेतकरी नेत्यांची उपस्थिती होती़शेतकरी कर्जमाफीबाबत बोलतांना खोत यांनी आमचे लबाडाचे आवतनं नाही, आम्ही जेवणच दिल़े पंधरा वर्षे तुमचे सरकार असताना का कर्जमाफी का देऊ शकला नाही?, पंधरा वर्षे ज्यांनी डल्ला मारला ते आता हल्लाबोलच्या माध्यमातून कोल्हेकुई करीत आहेत, या शब्दात त्यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी केलेल्या आरोपांचा व विरोधकांच्या हल्लाबोल आंदोलनाचा समाचार घेतला़ निवडणुकीच्या तोंडावर वीज देण्याचे आश्वासन देऊन निवडणुकीनंतर बिले वसूल केल्याची आठवणही खोत यांनी करून दिली़ २००८ च्या कर्जमाफीच्या तुलनेत चारपट अधिक कर्जमाफी दिल्याचा दावाही त्यांनी केला़दिवंगत यशवंतराव, वसंतदादा यांच्या नंतर शेतकºयांचा कळवळा असलेला मुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करीत फडणवीसांनी देशमुख, पवारांची मक्तेदारी मोडीत काढली म्हणून मगरीचे अश्रू सुरू आहेत़ पण फडणवीस आपला कार्यकाल पूर्ण करतील. त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन निवडणूक जिंकू, असा विश्वास कृषी राज्यमंत्री खोत यांनी शिर्डीत व्यक्त केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSadabhau Khotसदाभाउ खोत shirdiशिर्डी