शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

नगरमधील साखर कारखानदार पांढ-या कपड्यातील दरोडेखोर - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 17:12 IST

नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने उसाला केवळ २२०० ते २३०० रूपये भाव देतात. नगर जिल्ह्यातील साखर कारखानदार पांढ-या कपड्यातील दरोडेखोर आहेत, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.

संगमनेर : भ्रष्ट सरकार साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसल्याने शेतक-यांना ऊस दरासाठी रस्त्यावर यावं लागतं आहे. नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने उसाला केवळ २२०० ते २३०० रूपये भाव देतात. नगर जिल्ह्यातील साखर कारखानदार पांढ-या कपड्यातील दरोडेखोर आहेत, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.स्वातंत्र्यसैनिक साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीदिनी आयोजित कार्यक्रमासाठी खासदार शेट्टी संगमनेरात आले होते. त्यावेळी त्यांनी सरकार व सहकारी साखर कारखानदारांवर टीका केली. खासदार शेट्टी म्हणाले, नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना माज चढला आहे. शेतक-यांनी हाती उसाचा बोडखा घेतल्याशिवाय हा माज उतरणार नाही. चळवळीत राज्यात अग्रेसर असणारा नगर जिल्हा मागे पडल्याने येथे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अच्छे दिनाचे गाजर दाखवून सर्वांना फसवले आहे. उस वगळता कोणत्याही शेतमालाला हमी भाव नाही. दुस-या देशातून शेतमाल आयात करायचा, निर्यातीच्या बाबतीतही अडथळे निर्माण करायचे. शत्रू राष्ट्र असलेल्या पाकि स्तानातून कांदा आयात करायचा असे करत सरकार शेतक-यांची जिरावायचा प्रयत्न करते आहे. कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली. कर्जमाफीची जबाबदारी सोपविलेल्यांना कर्जाच्या पध्दतीची माहिती नसल्याने शेतक-यांच्या कर्जमाफीचा खेळ खंडोबा झाला. लोकसभेत देशातून ५४३ खासदार निवडुून जातात. मात्र, देशात होत असलेल्या शेतक-यांच्या आत्महेत्यबद्दल कुणीही संसदेत प्रश्न मांडत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRaju Shettyराजू शेट्टी