शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उसाची पळवापळवी; प्रवरा व संगमनेरला ऊस न देण्याचे भानुदास मुरकुटेंचे आवाहन

By शिवाजी पवार | Updated: January 29, 2024 14:27 IST

कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शेतकरी व सभासदांना श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु वाचविण्याची मागणी केली आहे.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : नगर जिल्ह्यात साखर कारखान्यांना उसाची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे येथील अशोक साखर कारखान्याच्या कार्यक्षत्रातील उसाची संगमनेर आणि प्रवरा साखर कारखान्यांनी तोडणी सुरू केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शेतकरी व सभासदांना श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु वाचविण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मुरकुटे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली आहे. श्रीरामपूर तालुक्याचे हक्काचे पाणी पळविणाऱ्या आणि या भागाचे वाळवंट करण्यासाठी टपलेल्या या नेत्यांच्या कारखान्यांना शेतकऱ्यांनी ऊस देऊ नये.

महसूलमंत्री विखे पाटील व माजी मंत्री थोरात यांचे श्रीरामपूर तालुक्याच्या ऊस उपलब्धता वाढीसाठी कोणतेही योगदान नाही. त्यामुळे ‘अशोक’च्या सभासद शेतकऱ्यांनी प्रवरा व संगमनेर कारखान्यास ऊस न देता आपल्या भागाची कामधेनु असणाऱ्या अशोक कारखान्यासच ऊस पुरवावा, असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले आहे.

मुरकुटे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, विखे व थोरातांनी आपल्या भागाचे पाणी पळविले. मी आमदार असताना विखेंनी प्रवरा परिसरात डाव्या कालव्यावर आडवे बांध घातले होते. ते मी सुरुंग लावून उद्ध्वस्त केले. प्रवरा डावा कालव्याचे नूतनीकरण करून वहन क्षमतेत दीडपट वाढ केली. हजारो एकराचे रद्द झालेल्या ब्लॉकचे फेरवाटप करून आपल्या भागाचे पाटपाणी संरक्षित केले. अशोक कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रतील ओढ्या-नाल्यांवर बंधाऱ्यांची मालिका उभारून पाणी उपलब्धता वाढविली. या सर्वांमुळे कार्यक्षेत्रातील उसाच्या उपलब्धतेत ३६ हजार टनवरून बारा लाख टनपर्यंत वाढ झाली. या उसावर प्रवरा व संगमनेर कारखान्याचा डोळा आहे. दोघेही नेते सत्तेच्या जोरावर आपल्या भागावर सतत अन्याय करतात, असा आरोप मुरकुटे यांनी केला. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने