शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

यंदा दोन महिन्यातच थंडावणार साखर कारखान्यांचा ‘बॉयलर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:10 IST

यंदा जिल्ह्यातील साखर कारखाने साधारपणे ६० ते ७० दिवसच चालतील, असा प्राथमिक अंदाज असून, ऊस मिळविण्याचे मोठे आव्हान जिल्ह्यातील साखर कारखानदारांसमोर आहे.

अण्णा नवथर । अहमदनगर : गतवर्षीच्या भीषण दुष्काळामुळे जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले आहे. जनावरांचा चारा म्हणून उसाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. परिणामी गाळपासाठी ऊस कमी शिल्लक राहिला.  त्यामुळे यंदा जिल्ह्यातील साखर कारखाने साधारपणे ६० ते ७० दिवसच चालतील, असा प्राथमिक अंदाज असून, ऊस मिळविण्याचे मोठे आव्हान जिल्ह्यातील साखर कारखानदारांसमोर आहे. यंदाच्या ऊस गाळप हंगामाला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे.  सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस गाळपाचा १ कोटी मेट्रीक टनाचा टप्पा पार केला होता. परंतु, गतवर्षी दुष्काळ असल्याने ऊस उत्पादक शेतकºयांनी उसाची लागवड केली नाही. कृषी विभागाचा अहवाल पाहता जिल्ह्यातील ७० हजार ९११ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झालेली आहे. परंतु, गेल्या वर्षभरात भीषण दुष्काळ पडला. जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला. हिरवा चारा उपलब्ध नव्हता.  उन्हाळ्यात उसाला पुरेल एवढे पाणी नव्हते. शेतक-यांचाही नाईलाज होता. त्यांनी ऊस जनावरांना चारा म्हणून विकला. त्यामुळे उसाचे क्षेत्र कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात तेवढा ऊस शिल्लक राहिलेला नाही. त्याचा परिणाम यंदाच्या ऊस गाळप हंगामावर झाला आहे. उसाअभावी जिल्ह्यातील नऊ साखर कारखाने बंद राहणार आहेत. उर्वरित १४ साखर कारखाने सुरू होतील. त्यांना गाळपासाठी परवानगीही देण्यात आलेली आहे. परंतु, तेही जास्त काळ चालू शकणार नाहीत.साधारणपणे ६० ते ९० दिवस जिल्ह्यातील करखाने चालतील, असा प्राथमिक अंदाज आहे.  ऊस क्षेत्र घटल्यामुळे ऊस मिळविण्यासाठी कारखान्यांची यंत्रणा कामाला लागली आहे.  ऊस मिळविण्यासाठी कारखान्यांमध्ये कमालीची स्पर्धा असून, अन्य जिल्ह्यातून ऊस आणण्याची तयारी कारखान्यांकडून सुरू आहे.हे कारखाने होणार सुरूअगस्ती सहकारी साखर कारखाना, डॉ़ पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, श्री़ ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, कुकडी सहकारी साखर कारखाना, मुळा सहकारी साखर कारखाना, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, श्री वृध्देश्वर,  संजीवनी,  श्री क्रांती शुगर, गंगामाई, श्री अंबिका, श्री साईकृपा, युटेक शुगऱ उसाचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)    नगर ६६६, पारनेर १,७९३, श्रीगोंदा ११,१७९, कर्जत २,५७६, जामखेड ६५९, शेवगाव १०,१२९, पाथर्डी ३,२०३, नेवासा १३,०९७, राहुरी११,२८१, संगमनेर ३,९०८, अकोले ३,४०५, कोपरगाव ३,६९२, श्रीरामपूर ३,५११, राहाता १,७९४़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने