शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
4
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
5
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
6
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
7
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
8
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
9
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
10
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
12
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
13
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
14
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
15
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
16
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
17
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
18
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
19
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
20
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध

केंद्रप्रमुखांच्या बदल्यांना अचानक स्थगिती

By admin | Updated: May 23, 2014 01:28 IST

अहमदनगर : तीन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागावर उपाध्यापक, पद्वीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या बदल्या ऐनवेळी थांबविण्याची वेळ आली होती.

 अहमदनगर : तीन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागावर उपाध्यापक, पद्वीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या बदल्या ऐनवेळी थांबविण्याची वेळ आली होती. हीच परिस्थिती केंद्रप्रमुख्यांच्या बदल्यांच्या दिवशी झाली. ऐनवेळी शिक्षण विभागाला या बदल्यांना स्थगिती देण्यात येत असल्याचे जाहीर करावे लागले. पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचा बदल्याचा विषय गाजत आहे. शिक्षक संघटनांनी यंदा प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी थेट ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. यामुळे राज्याच्या ग्रामविकास विभागाने आतापर्यंत शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात तीन वेगवेगळे परिपत्रक काढलेले आहे. पहिल्या परिपत्रकात गेल्या वर्षी प्रमाणे बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर १५ मेच्या अध्यादेशात आधी पदोन्नती, त्यानंतर समायोजन आणि त्यानंतर यथावकाश शिक्षकांच्या बदल्या करण्याचे सांगण्यात आले. यात सुरुवातीला मुख्याध्यापक, पद्वीधर शिक्षक, आणि उपशिक्षकांचा समावेश होता. २१ मे रोजी ग्रामविकास विभागाच्या सुधारित आदेशात केंद्रप्रमुखांच्या बदल्यांना स्थगिती दिलेली आहे. यात केंद्रप्रमुख हे शिक्षक संवर्गातील असल्याने त्यांचे आधी समायोजन, त्यानंतर पदोन्नती आणि त्यानंतर बदल्या करण्यास सांगण्यात आलेले आहे. जिल्ह्यात २३६ केंद्रप्रमुख आहेत. त्यांना प्रशासकीय बदल्यातून सवलत मिळणार आहे. शिक्षण विभागाने बुधवारपर्यंत या संवर्गातील केंद्रप्रमुखांच्या बदल्याची तयारी पूर्ण केली होती. मात्र, सरकारच्या सुधारित आदेशामुळे ही प्रक्रिया थांबवावी लागली. आता केवळ शिक्षण विस्तार अधिकारी या संवर्गातील बदल्या होणे बाकी आहेत. यामुळे यंदा शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ कायम राहणार आहे. येत्या १६ जूनला प्राथमिक शाळा सुरू होणार असून यापूर्वी बदल्या करता येणार आहेत. अन्यथा वर्षभर बदल्या करण्यास संधी मिळणार नाही. (प्रतिनिधी) यंदाच्या सर्वसाधारण बदल्यात कर्मचार्‍यांच्या विनंती बदल्या झालेल्या नाहीत. प्रशासन गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने आपसी विनंती बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय कोरडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहे. ग्रामपंचायत विभागातील ५६ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात पेसा कायदात ९ ग्रामसेवक, समानीकरणात २१ ग्रामसेवक आणि १६ ग्रामसेवकांचे आपसी बदल्या करण्यात आलेल्या आहेत. १० ग्रामविकास अधिकार्‍यांच्या समानीकरणात बदल्या करण्यात आलेल्या आहेत. नगरप्रमाणे राज्यातील केंद्रप्रमुखांच्या बदल्यांना स्थगिती मिळाली आहे. राज्य जिल्हा परिषद केंद्रप्रमुख संघाने अर्जुन साळवे यांच्या नेतृत्वाखाली यासाठी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांची भेट घेत पाठपुरावा केला. आपसी आणि विनंती बदल्या संदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय होणार आहे. - अशोक घाडगे, कार्याध्यक्ष केंद्रप्रमुख संघ.