शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागाकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : दीड वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. सर्व क्षेत्र या महामारीच्या सावटाखाली आहे. उद्योग, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : दीड वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. सर्व क्षेत्र या महामारीच्या सावटाखाली आहे. उद्योग, व्यवसाय, व्यापार, रोजगार यांच्यासह सर्वच प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षापासून ऑफलाइन शिक्षणाचे धडे बंद झाले आहे. त्यातच शहरात राहण्यासाठी अथवा प्रवास करण्यासाठी कोणत्याच प्रकारची सार्वजनिक वाहतूक पाहिजे त्या प्रमाणात सुरू नाही. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांचा अकरावीचे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागाकडे ओढा असल्याचे दिसू लागले आहे.

कोरोनामुळे दीड वर्षांपासून सततचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे शहरात राहण्याची, जेवणाची व प्रवासाची मोठी गैरसोय होते आहे. मोठ्या शहरात शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी सद्य:स्थिती तशी नाही. कारण गेल्यावर्षी शहरात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यांचे अनुभव पाहता यंदा दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्याची विद्यार्थ्यासह पालकांची मानसिकता झाली आहे.

.............

जिल्ह्यात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये - ४४०

एकूण जागा - ७६,६००

यंदा दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी - ७०,५६६

अनुदानित तुकड्या - ४५३

विनाअनुदानित तुकड्या - २९५

स्वयंअर्थसहाय तुकड्या - १९२

..............

यंदा माझा दहावीत प्रथम क्रमांक आला आहे. अकरावीत प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ठेवण्यात आली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर माझी मोठ्या शहरातील महाविद्यालयात प्रवेश न घेता कोपरगाव येथे प्रवेश घेण्याची इच्छा आहे.

- श्रुती वरकड, विद्यार्थिनी

...........

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो आहे. कोरोनाची परिस्थिती असल्याने आमची व पालकांची आमच्या गावातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत प्रवेश घेण्याची तयारी झाली आहे.

- यश गोरे व विशाल गोरे, विद्यार्थी

..............