शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागाकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : दीड वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. सर्व क्षेत्र या महामारीच्या सावटाखाली आहे. उद्योग, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : दीड वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. सर्व क्षेत्र या महामारीच्या सावटाखाली आहे. उद्योग, व्यवसाय, व्यापार, रोजगार यांच्यासह सर्वच प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षापासून ऑफलाइन शिक्षणाचे धडे बंद झाले आहे. त्यातच शहरात राहण्यासाठी अथवा प्रवास करण्यासाठी कोणत्याच प्रकारची सार्वजनिक वाहतूक पाहिजे त्या प्रमाणात सुरू नाही. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांचा अकरावीचे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागाकडे ओढा असल्याचे दिसू लागले आहे.

कोरोनामुळे दीड वर्षांपासून सततचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे शहरात राहण्याची, जेवणाची व प्रवासाची मोठी गैरसोय होते आहे. मोठ्या शहरात शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी सद्य:स्थिती तशी नाही. कारण गेल्यावर्षी शहरात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यांचे अनुभव पाहता यंदा दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्याची विद्यार्थ्यासह पालकांची मानसिकता झाली आहे.

.............

जिल्ह्यात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये - ४४०

एकूण जागा - ७६,६००

यंदा दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी - ७०,५६६

अनुदानित तुकड्या - ४५३

विनाअनुदानित तुकड्या - २९५

स्वयंअर्थसहाय तुकड्या - १९२

..............

यंदा माझा दहावीत प्रथम क्रमांक आला आहे. अकरावीत प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ठेवण्यात आली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर माझी मोठ्या शहरातील महाविद्यालयात प्रवेश न घेता कोपरगाव येथे प्रवेश घेण्याची इच्छा आहे.

- श्रुती वरकड, विद्यार्थिनी

...........

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो आहे. कोरोनाची परिस्थिती असल्याने आमची व पालकांची आमच्या गावातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत प्रवेश घेण्याची तयारी झाली आहे.

- यश गोरे व विशाल गोरे, विद्यार्थी

..............