शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

एसटी नसल्याने विद्यार्थी शाळेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:20 IST

पळवे : २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झालेले असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुक्यात जाण्या-येण्यासाठी बसची सुविधा नसल्याने ...

पळवे : २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झालेले असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुक्यात जाण्या-येण्यासाठी बसची सुविधा नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पारनेर तालुक्यातील पारनेर ते पाडळी-रांजणगाव एसटी बसच्या फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी पालकांसह ग्रामस्थांमधून केली जात आहे.

म्हसणे सुलतान, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा, रूई छत्रपती, कडूस, पाडळी रांजणगाव, श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी आदी गावांतील विद्यार्थी पारनेर येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. २३ नोव्हेंबर २०२० रोजी शालेय शिक्षण विभागाने इयत्ता ९ ते १२ वीच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे आदेश काढले. शहरातील सर्व एसटी बस टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या. मात्र ग्रामीण भागात अद्याप एसटी बसच्या सेवा बंद असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. विशेषत: शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थिनींना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. पालकांकडे दुचाकी असणारे शाळेत दुचाकीवरून जातात. मात्र ज्यांच्या पालकांकडे दुचाकी नाहीत अशा विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शासनाच्या वतीने २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप ग्रामीण भागात एसटी बस सुरू नसल्याने मुलांना शाळेत पाठवायचे कसे, या विवंचनेत पालकवर्ग सापडला आहे.