शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

संघर्षशील नेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:20 IST

गांधी हे अल्पसंख्याक समाजातून पुढे आले. नगर जिल्हा हा राजकीयदृष्ट्या मातब्बर आहे. अशा ठिकाणी अल्पसंख्याक नेत्याने आपले पाय रोवणे ...

गांधी हे अल्पसंख्याक समाजातून पुढे आले. नगर जिल्हा हा राजकीयदृष्ट्या मातब्बर आहे. अशा ठिकाणी अल्पसंख्याक नेत्याने आपले पाय रोवणे हे कठीण काम होते. मात्र, गांधी यांनी जातीपातीची भिंत भेदत राजकारण केले. त्यांचा कोणत्याही समाजाने कधी द्वेष केला नाही. ते भाजपमध्ये होते व हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते होते. मात्र, तरी त्यांचे मुस्लीम समाजातही तितकेच सलोख्याचे संबंध होते. त्यांची भाषा विखारी नव्हती.

राजकारण हे श्रीमंतांचे काम आहे. आमदार, खासदार होण्यासाठी तुमच्या पाठीशी मोठ्या संस्था हव्यात, असा अनेकांचा समज आहे. मात्र, गांधी यांनी या सर्व बाबींना छेद दिला. अवघे दहावी शिक्षण असलेल्या गांधी यांनी ज्युसची गाडी सुरू करत व्यवसायाचा आरंभ केला. पुढे जनसंघाच्या व भाजपच्या माध्यमातून राजकारणात आलेले गांधी हे सतत मोठे आव्हान पेलत गेले. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच त्यांनी नगरचे लोकप्रिय नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांच्या विरोधात निवडणूक लढवून केली. त्या निवडणुकीत ते विजयी झाले. पुढे नगरपालिकेत उपनगराध्यक्ष झाले.

१९९९ साली खासदारकीची पहिली निवडणूक लढवली व ते विजयी झाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय जहाजबांधणी मंत्री झाले. केंद्रात त्यांनी उत्तम संबंध प्रस्थापित केले होते. अटलबिहारी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, सुरेश प्रभू, नितीन गडकरी या भाजप नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. या सर्व नेत्यांकडे त्यांचा चांगला वावरही होता. दिल्लीत त्यांचा रुबाब होता. तेथे वावरताना एक आत्मविश्वासही त्यांच्यात दिसत होता. १९९९, २००९ व २०१४ अशा तीन निवडणुकांमध्ये ते लोकसभेत पोहोचले. भाजपच्या अंतर्गत कुरघोड्यांतून २००४ च्या निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारून ना. स. फरांदे यांना अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी दिली गेली. गांधी यांचे दिल्लीत वजन वाढू नये यासाठी काही नेत्यांनी मुद्दामहून हे षड्‌यंत्र केले होते. मात्र, त्याची किंमत भाजपला चुकवावी लागली. भाजपने ही निवडणूक गमावली. पक्षाने तिकीट नाकारले, मात्र गांधी यांनी पक्ष सोडला नाही. २०१९ च्या निवडणुकीतही पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारत ऐनवेळी पक्षात आलेल्या सुजय विखे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे गांधी यांच्यावर एकप्रकारे पुन्हा अन्याय झाला. मात्र, तरीही त्यांनी भाजपची साथ सोडली नाही. अखेरच्या क्षणापर्यंत ते पक्षासोबत एकनिष्ठ राहिले.

खासदार असताना त्यांचा मतदारसंघात अगदी गावपातळीवर सामान्य कार्यकर्त्याशी संपर्क होता. व्यापारी व शेतकरी अशा दोन्ही घटकांशी संबंध ठेवण्याचे कसब त्यांच्याकडे होते. पक्षसंघटनेतही जिल्हा सरचिटणीस ते जिल्हाध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली. कुठलाही कार्यक्रम आखताना तो भव्यदिव्य व आखीव रेखीव कसा होईल यावर त्यांचा कटाक्ष असे. संघटनेवर सतत आपली पकड ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यामुळे त्यांचा संघर्ष हा विरोधी पक्षांऐवजी सेना-भाजपच्या नेत्यांशीच अधिक झाला. मात्र, त्याची त्यांनी तमा बाळगली नाही. शिवसेनेचे अनिल राठोड व गांधी यांच्यातही मोठा संघर्ष असायचा. अर्थात, या दोघांनाही व्यापक जनाधार व मान्यता होती. दुर्दैवाने कोरोनाने हे दोन्ही नेते नगरकरांपासून हिरावले.

नगर अर्बन बँंकेचे अध्यक्षपदही गांधी यांनी भूषविले. ही बँंक अलीकडे अडचणीत आली आहे. तिच्यावर प्रशासक आल्याने गांधी यांच्यावर टीका झाली. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष होण्याच्या अगोदरच त्यांनी हे जग सोडले. गांधी हे स्वभावाने दिलदार होते. नगरच्या विकासासाठी त्यांनी अनेक दिल्लीवारी केल्या. मात्र, त्यांनी अखेरचा विसावाही दिल्लीत घ्यावा ही चटका लावणारी बाब आहे.

- सुधीर लंके