शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

पथविक्रेता कागदावरच आत्मनिर्भर; बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 14:38 IST

लॉकडाऊनच्या काळात बंद पडलेले व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना आणली. मात्र अजूनतरी बँकांकडून या योजनेतून लाभ दिला जात नाही. पथविक्रेत्यांसाठी सुरु केलेली ही योजना अजून कागदावरच आहे.

अण्णा नवथर । रोहित टेके । अनिल साठे । 

लोकमत स्टींग

अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात बंद पडलेले व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना आणली. मात्र अजूनतरी बँकांकडून या योजनेतून लाभ दिला जात नाही. पथविक्रेत्यांसाठी सुरु केलेली ही योजना अजून कागदावरच आहे. या योजनेचे निर्देश नाहीत, अशी काहीही योजना नाही, अशी उत्तरे देऊन पथविक्रेत्यांना थेट कर्जास नकार दिला जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले.

काय आहे योजनाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात पथविक्रेत्यांचे व्यवसाय बंद होते. त्यामुळे पथविके्रत्यांवर उपासमारीची वेळ आली. त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पथविके्रता आत्मनिर्भर निधी योजनेची घोषणा केली. हा आदेश १७ जून २०२० रोजी राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका आणि बँकांना पाठविण्यात आला. या योजनेतून छोट्या व्यावसायिकांना १० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. 

‘लोकमत’ने कसे केले स्टिंग आॅपरेशन‘लोकमत’ने मंगळवारी (७ जुलै) एका विक्रेत्याला स्वत: बँकेत पाठवून कर्जाची मागणी करायला लावली. यादरम्यान होणा-या संवादाचे रेकॉर्डिंग करण्यास सांगण्यात आले. अहमदनगर शहर, कोपरगाव, शेवगाव येथील बँकांमध्ये जाऊन विक्रेत्यांनी पंतप्रधान पथविके्रता आत्मनिर्भर निधी योजनेतून कर्जाची मागणी केली. परंतु हा आदेश आमच्याकडे आला नाही, असे सांगत कर्जास नकार दिला.

या संदर्भात आम्हाला कोणत्याही प्रकारचे सर्क्युलर आलेले नाही. सर्क्युलर आले असते तर गरिबांना मदतच केली असती.-मनोरंजन मोहंती, व्यवस्थापक, बँक आॅफ महाराष्ट्र, कोपरगाव शाखा.

युनियन बँकेच्या प्रोफेसर चौकातील शाखेत व्यवस्थापक नाहीत. त्यामुळे त्यांना निर्णय घेता येत नाहीत़. परंतु, पंतप्रधान पथविके्रता आत्मनिर्भर योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना अटी व शर्तींचे पालन करून युनियन बँकेच्या वतीने कर्ज वाटप करण्यात येणार आहे. तशा सूचना सर्व शाखांना देण्यात येतील.-मुशीर खान, जिल्हा समन्वयक, युनियन बँक

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCentral Governmentकेंद्र सरकारBanking Sectorबँकिंग क्षेत्र