शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

पक्ष कार्यालयात जाणे थांबले, शिबिरे बंद; पुरोगामी पिढी घडविण्यात अपयश आले: माजीमंत्री बाळासाहेब थोरात

By शिवाजी पवार | Updated: November 20, 2023 16:06 IST

पुरोगामी विचारांची तरुण पिढी घडविण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला.

शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर): पुरोगामी विचारांची तरुण पिढी घडविण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला. सत्तेवर असताना पक्ष कार्यालयात जाण्याचे नेत्यांनी बंद केले. पक्षाची शिबिरेही थांबली, अशी खंत माझी मंत्री व काँग्रेस पक्षाची ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. या सर्व परिस्थितीचा परिणाम म्हणून देशांतील लोकशाही डळमळीत झाली आहे, अशी भीती थोरात यांनी व्यक्त केली.

कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवन गौरव पुरस्कार श्रीरामपूर येथे रविवारी सायंकाळी माजीमंत्री थोरात यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना थोरात बोलत होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो, आमदार लहू कानडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, करण ससाणे, सचिन गुजर, साधना गायकवाड, सुभाष लांडे, बन्सी सातपुते आदी यावेळी उपस्थित होते. खंडकरी नेते अण्णासाहेब थोरात यांचाही गौरव यावेळी करण्यात आला.

थोरात म्हणाले, भारतीय लोकशाही धोक्यात आल्याचे चित्र आहे. पुढील काळात मताचा अधिकार देखील सुरक्षित राहण्याविषयी आपल्याला शंका आहे. शेतकरी विरोधी तीन कायदे शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर सरकारने मागे घेतले. मात्र याबरोबरच तीन नवीन कामगार कायदे अस्तित्वात आले आहेत. त्यात कामगारांना युनियन करण्याची संधी देखील काढून घेण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेचे काय होणार, याची काळजी वाटावी अशी स्थिती आहे.  हे असे का घडले याचा विचार करणे गरजेचे आहे. काँग्रेससह डावे पक्ष पुरोगामी विचारांची तरुण पिढी घडविण्यात कमी पडले. लोकशाही मूल्ये तरुणांमध्ये रुजविण्यात आपण सर्वजण कमी पडलो. राष्ट्र सेवा दलांची शिबिरे काही प्रमाणात सुरू आहेत, असे थोरात म्हणाले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस