शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

पक्ष कार्यालयात जाणे थांबले, शिबिरे बंद; पुरोगामी पिढी घडविण्यात अपयश आले: माजीमंत्री बाळासाहेब थोरात

By शिवाजी पवार | Updated: November 20, 2023 16:06 IST

पुरोगामी विचारांची तरुण पिढी घडविण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला.

शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर): पुरोगामी विचारांची तरुण पिढी घडविण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला. सत्तेवर असताना पक्ष कार्यालयात जाण्याचे नेत्यांनी बंद केले. पक्षाची शिबिरेही थांबली, अशी खंत माझी मंत्री व काँग्रेस पक्षाची ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. या सर्व परिस्थितीचा परिणाम म्हणून देशांतील लोकशाही डळमळीत झाली आहे, अशी भीती थोरात यांनी व्यक्त केली.

कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवन गौरव पुरस्कार श्रीरामपूर येथे रविवारी सायंकाळी माजीमंत्री थोरात यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना थोरात बोलत होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो, आमदार लहू कानडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, करण ससाणे, सचिन गुजर, साधना गायकवाड, सुभाष लांडे, बन्सी सातपुते आदी यावेळी उपस्थित होते. खंडकरी नेते अण्णासाहेब थोरात यांचाही गौरव यावेळी करण्यात आला.

थोरात म्हणाले, भारतीय लोकशाही धोक्यात आल्याचे चित्र आहे. पुढील काळात मताचा अधिकार देखील सुरक्षित राहण्याविषयी आपल्याला शंका आहे. शेतकरी विरोधी तीन कायदे शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर सरकारने मागे घेतले. मात्र याबरोबरच तीन नवीन कामगार कायदे अस्तित्वात आले आहेत. त्यात कामगारांना युनियन करण्याची संधी देखील काढून घेण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेचे काय होणार, याची काळजी वाटावी अशी स्थिती आहे.  हे असे का घडले याचा विचार करणे गरजेचे आहे. काँग्रेससह डावे पक्ष पुरोगामी विचारांची तरुण पिढी घडविण्यात कमी पडले. लोकशाही मूल्ये तरुणांमध्ये रुजविण्यात आपण सर्वजण कमी पडलो. राष्ट्र सेवा दलांची शिबिरे काही प्रमाणात सुरू आहेत, असे थोरात म्हणाले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस