शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कपाशीच्या नुकसानभरपाईसाठी बालमटाकळीत रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 15:59 IST

शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बालमटाकळी परिसरातील कपाशीला बोंड आळी रोगाने ग्रासले असून त्यामुळे कपाशीचे पीक वाया जाण्याची परिस्थिती ओढावली आहे.

बालमटाकळी : शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बालमटाकळी परिसरातील कपाशीला बोंड आळी रोगाने ग्रासले असून त्यामुळे कपाशीचे पीक वाया जाण्याची परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे कपाशीचे सरसकट पंचनामे करुन शेतक-यांना नुकसान भरपाई मिळवी, या मागणीसाठी शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.शेवगाव-गेवराई या महामार्गावर बालमटाकळी येथे सुमारे दीड ते दोन तास हा रास्ता रोको होता़ श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी संजय कासुळे यांनी पंचनामे करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित केले. या आंदोलनात रामनाथ राजपुरे, कासम शेख, मोहनराव देशमुख, चंद्रकांत गरड, विक्रम बारवकर, बाळासाहेब जाधव, चंद्रकांत बागडे, बाळासाहेब देशमुख, वसंत घाडगे, भास्कर बामदळे, अंकुश पोळ, पांडुरंग वैद्य, दिलीप गरड, छगन राजपुरे, सुरेश बमदळे, तुळसीदास भोंगळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेवगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके, गावडे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला. रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.दरम्यान श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी कासुळे, तालुका कृषी अधिकारी अशोक साळी, बोधेगाव मंडळ कृषी विभागातील कर्मचारी, तलाठी लोहकरे, ग्रामसेवक काटे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून शेतक-यांचा प्रश्न समजून घेतला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावFarmerशेतकरीcottonकापूस