शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

पगारवाढीसाठी काम बंद

By admin | Updated: August 24, 2014 02:06 IST

शेवगाव : शेवगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीतील कामकाज ठप्प झाले आहे़

शेवगाव : शेवगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीतील कामकाज ठप्प झाले आहे़ त्यामुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे शहरातील साफ सफाईचे कामेही ठप्प झाल्याने बाजारपेठेसह शहरात ठिकठिकाणी कचरा, घाण मोठ्या प्रमाणात साचल्याचे व सर्वत्र कचऱ्याचे मोठे ढीग साचले आहेत़ ग्रामपंचायतीची घंटागाडी सुविधाही बंद असल्याने घरात साचलेल्या कचऱ्याचे करायचे काय, या विवंचनेमुळे महिला हैराण झाल्या आहेत. सर्वत्र कचरा, घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने शहरवासीयांच्या आरोग्याची समस्याही ऐरणीवर आली आहे.शेवगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाबाबत ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजू साळवे यांनी सांगितले की, १५ आॅगस्ट रोजी झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पगारवाढीची घोषणा केली़ त्यामुळे प्रत्येक वर्षी पगारवाढ मिळत आहे. मात्र यंदा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली नाही़ पगारवाढीबाबत ग्रामपंचायत प्रशासन टाळाटाळ करीत आहे़ त्यामुळे कामगारांना बेमुदत कामबंद आंदोलन करावे लागल्याचे साळवे यांनी सांगितले़शेवगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब डोईफोडे म्हणाले की, शेवगाव ग्रामपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या २४५ असून, पगारासाठी महिन्याकाठी ९ लाख रुपयांची रक्कम खर्ची होते. सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता ग्रामपंचायतीचे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नाही़ याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेला दिली. मात्र तरीही ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेकडून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले असून, ते दुर्दैवी असल्याचे ग्रामविकास अधिकारी डोईफोडे म्हणाले.शेवगाव शहराची लोकसंख्या ४० हजाराच्याही पुढे जाऊन पोहचली आहे. शहराचा विस्तार व वाढती लोकसंख्या लक्षात घेता ग्रामस्थांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात ग्रामपंचायत प्रशासन असमर्थ ठरत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत़ तर कर्मचाऱ्यांकडून वारंवार बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात येत असल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे़ विविध मागण्यांखाली कर्मचारीही ग्रामस्थांची कोंडी करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़ नागरिकांची अडवणूक व कोंडी थांबविण्याची मागणी होत आहे़ (तालुका प्रतिनिधी)