शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

कारखानदारीसाठी खडतर हंगाम

By admin | Updated: June 25, 2016 00:38 IST

अहमदनगर : साखर कारखानदारीचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या नगर जिल्ह्यात यंदा उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले आहे. याचा परिणाम साखर कारखान्यांवर होणार असून

अहमदनगर : साखर कारखानदारीचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या नगर जिल्ह्यात यंदा उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले आहे. याचा परिणाम साखर कारखान्यांवर होणार असून २२ पैकी किती कारखान्यांचे बॉयलर यंदा पेटणार याबाबत सध्या तरी साशंकता आहे. साखरेचे पडलेले दर, वाढलेला उत्पादन खर्च, सरकारची अनास्था याचा फटका साखर कारखानदारीला बसलेला आहे. या परिस्थितीत कारखानदारी कशी टिकणार,असा प्रश्न आहे. सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून नगरकडे पाहिले जाते. सहकाराचे सर्वात मोठे जाळे नगर जिल्ह्यात असून सहकारी साखर कारखान्यासोबत खासगी साखर कारखानदारी जिल्ह्यात वाढलेली आहे. मात्र, घटलेले पर्जन्यमान, धरणातील पाण्याचा प्रश्न, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्याला सोडण्यात येणारे पाणी यामुळे जिल्ह्यातील शेती उजाड झालेली आहे. याचा सर्वात मोठा फटका उसाच्या पिकाला बसलेला आहे. मे महिन्यात प्रादेशिक सहसंचालक कार्यालय( साखर) यांनी काढलेल्या प्राथमिक अंदाजात गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात १ लाख १२ हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक गाळपासाठी होते. यंदा हे क्षेत्र अवघे ६० हजार ९७२ हेक्टर क्षेत्र असल्याचे या अहवालात म्हटले आहे. गेल्यावर्षी ९२ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप होवून त्यातून १ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. साखर उताराही १०.९५ टक्के निघाला होता. उसाच्या कमतरतेमुळे यंदा ऊस तोडणी मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड राहणार आहे. जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांना दीड लाखांच्या जवळपास कामगारांची गरज असते. यंदा निम्म्याने कारखाने बंद राहिल्यास त्याचा परिणाम तोडणी कामगारांवर होणार आहे. सरकारच्या कामगारांच्या उदासीन धोरणामुळे आधीच फरपट सुरू असणाऱ्या कामगारांसमोरील अडचणी वाढणार आहेत. (प्रतिनिधी)