शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज्यस्तरीय भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर

By सचिन धर्मापुरीकर | Updated: November 30, 2023 18:19 IST

या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण लोककवी प्रशांत मोरे व लेखक डॉ. प्रशांत आंबरे यांच्या हस्ते होणार आहे.

कोपरगाव (जि. अहमदनगर) : भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कार प्राप्त लेखकांमध्ये नागू विरकर (सातारा), गणपत जाधव (सोलापूर), आप्पासाहेब खोत (कोल्हापूर), मनीषा पाटील (सांगली), प्रवीण पवार(धुळे), डॉ.रवींद्र कानडजे (बुलडाणा), डॉ. मारोती घुगे (जालना) या लेखकांचा समावेश आहे, अशी माहिती भि. ग. रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे व पुरस्कार योजनेचे कार्यवाह डॉ. गणेश देशमुख व सहकार्यवाह डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. संजय दवंगे यांनी येथे दिली. या प्रसंगी ट्रस्टी रमेशराव रोहमारे, शोभाताई रोहमारे, संदीप रोहमारे, ॲड. राहुल रोहमारे व प्राचार्य डॉ. बी.एस. यादव उपस्थित होते.

भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे ग्रामीण साहित्यातील कवितासंग्रह, कादंबरी, कथासंग्रह व समीक्षा या साहित्यप्रकारातील सर्वोत्कृष्ट ग्रंथांना दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी २०२२ या वर्षातील पुढील ग्रंथांना पुरस्कार जाहीर केले आहेत.

हेडाम - नागू विरकर (ग्रामीण कादंबरी - समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर), हावळा - गणपत जाधव (ग्रामीण कथासंग्रह - शब्द शिवार प्रकाशन, मंगळवेढा), काळीज विकल्याची गोष्ट- आप्पासाहेब खोत (ग्रामीण कथासंग्रह, ललित पब्लिकेशन, मुंबई) विभागून, नाती वांझ होताना - मनीषा पाटील हरोलीकर (ग्रामीण कविता संग्रह, संस्कृती प्रकाशन,पुणे), भुई आणि बाई - प्रविण पवार(ग्रामीण कविता संग्रह, परिस पब्लिकेशन, पुणे) विभागून, शेतकरी जीवनसंघर्ष : ऐतिहासिक परामर्श - डॉ.रवींद्र कानडजे (ग्रामीण समीक्षा, नाग-नालंदा प्रकाशन, इस्लामपूर, १९८० पूर्वीची ग्रामीण कविता : प्रेरणा आणि प्रवृत्ती - डॉ. मारुती घुगे (ग्रामीण समीक्षा, यशोदीप पब्लिकेशन्स) विभागून प्रत्येक साहित्य प्रकारातील ग्रंथांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. कै. के. बी. रोहमारे यांनी स्थापन केलेल्या भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे १९८९ पासून हा उपक्रम राबविण्यात येतो. ग्रामीण नवलेखकांच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे, हा उद्देश असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी सांगितले.

या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण लोककवी प्रशांत मोरे व लेखक डॉ. प्रशांत आंबरे यांच्या हस्ते दि. ७ डिसेंबर रोजी के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव येथे केले जाणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरliteratureसाहित्य