शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

राज्यस्तरीय भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर

By सचिन धर्मापुरीकर | Updated: November 30, 2023 18:19 IST

या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण लोककवी प्रशांत मोरे व लेखक डॉ. प्रशांत आंबरे यांच्या हस्ते होणार आहे.

कोपरगाव (जि. अहमदनगर) : भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कार प्राप्त लेखकांमध्ये नागू विरकर (सातारा), गणपत जाधव (सोलापूर), आप्पासाहेब खोत (कोल्हापूर), मनीषा पाटील (सांगली), प्रवीण पवार(धुळे), डॉ.रवींद्र कानडजे (बुलडाणा), डॉ. मारोती घुगे (जालना) या लेखकांचा समावेश आहे, अशी माहिती भि. ग. रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे व पुरस्कार योजनेचे कार्यवाह डॉ. गणेश देशमुख व सहकार्यवाह डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. संजय दवंगे यांनी येथे दिली. या प्रसंगी ट्रस्टी रमेशराव रोहमारे, शोभाताई रोहमारे, संदीप रोहमारे, ॲड. राहुल रोहमारे व प्राचार्य डॉ. बी.एस. यादव उपस्थित होते.

भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे ग्रामीण साहित्यातील कवितासंग्रह, कादंबरी, कथासंग्रह व समीक्षा या साहित्यप्रकारातील सर्वोत्कृष्ट ग्रंथांना दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी २०२२ या वर्षातील पुढील ग्रंथांना पुरस्कार जाहीर केले आहेत.

हेडाम - नागू विरकर (ग्रामीण कादंबरी - समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर), हावळा - गणपत जाधव (ग्रामीण कथासंग्रह - शब्द शिवार प्रकाशन, मंगळवेढा), काळीज विकल्याची गोष्ट- आप्पासाहेब खोत (ग्रामीण कथासंग्रह, ललित पब्लिकेशन, मुंबई) विभागून, नाती वांझ होताना - मनीषा पाटील हरोलीकर (ग्रामीण कविता संग्रह, संस्कृती प्रकाशन,पुणे), भुई आणि बाई - प्रविण पवार(ग्रामीण कविता संग्रह, परिस पब्लिकेशन, पुणे) विभागून, शेतकरी जीवनसंघर्ष : ऐतिहासिक परामर्श - डॉ.रवींद्र कानडजे (ग्रामीण समीक्षा, नाग-नालंदा प्रकाशन, इस्लामपूर, १९८० पूर्वीची ग्रामीण कविता : प्रेरणा आणि प्रवृत्ती - डॉ. मारुती घुगे (ग्रामीण समीक्षा, यशोदीप पब्लिकेशन्स) विभागून प्रत्येक साहित्य प्रकारातील ग्रंथांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. कै. के. बी. रोहमारे यांनी स्थापन केलेल्या भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे १९८९ पासून हा उपक्रम राबविण्यात येतो. ग्रामीण नवलेखकांच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे, हा उद्देश असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी सांगितले.

या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण लोककवी प्रशांत मोरे व लेखक डॉ. प्रशांत आंबरे यांच्या हस्ते दि. ७ डिसेंबर रोजी के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव येथे केले जाणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरliteratureसाहित्य