शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
Stock Markets Today: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात घसरण; निफ्टी २५,००० च्या खाली, Wipro, Tata Motors, BEL मध्ये तेजी
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
8
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
9
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
10
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
11
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
12
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
13
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
14
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
15
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
16
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
17
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
18
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
19
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
20
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे

राज्य सरकारचा ‘पाणी’दार निर्णय

By admin | Updated: May 29, 2014 00:26 IST

अहमदनगर : उन्हाळ्यामुळे निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि त्यामुळे होणारी जनतेची पायपीट थांबविण्यासाठी राज्य सरकारने अनेक ‘पाणी’दार निर्णय घेतले आहेत.

अहमदनगर : उन्हाळ्यामुळे निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि त्यामुळे होणारी जनतेची पायपीट थांबविण्यासाठी राज्य सरकारने अनेक ‘पाणी’दार निर्णय घेतले आहेत. टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना दिले आहेत. तसेच वीज बिलाअभावी ज्या पाणी योजना बंद आहेत. ती देयके सरकार भरणार आहे. या निर्णयामुळे टंचाईग्रस्त गावांतील लोकांची तहान भागणार आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील अध्यादेश २७ मे रोजी काढण्यात आला. राज्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू, जनाई-शिरसाई, पुरंदर, उरमोडी, मुक्ताईनगर या उपसा सिंचन योजनांची १५ मे ते १५ जून दरम्यानची विद्युत देयके टंचाई निधीतून अदा करण्यासही मंजुरी मिळाली आहे. राज्यातील हंगामी पाणी पुरवठा योजना तसेच प्रादेशिक पाणी योजना वीज देयके थकल्याने बंद आहेत. त्या परिसरात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. टँकरचा खर्च जर वीज बिलापेक्षा जास्त होत असेल तेथील वीज बिलेही भरण्यासही हिरवा कंदील दाखवला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या सार्वजनिक विहिरींना पाईपलाईन व विद्युत मोटारी बसविण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठीचा खर्चही टंचाई निधीतून भागविण्यात यावा, असेही अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) टँकरचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येईपर्यंत विलंब होतो. वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रशासनाला टंचाई निवारणासाठी तातडीने उपाययोजना करता येतील.या संदर्भातील अध्यादेश बुधवारी प्राप्त झाला आहे. -अनिल कवडे, जिल्हाधिकारी, नगर.