शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारचा ‘पाणी’दार निर्णय

By admin | Updated: May 29, 2014 00:26 IST

अहमदनगर : उन्हाळ्यामुळे निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि त्यामुळे होणारी जनतेची पायपीट थांबविण्यासाठी राज्य सरकारने अनेक ‘पाणी’दार निर्णय घेतले आहेत.

अहमदनगर : उन्हाळ्यामुळे निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि त्यामुळे होणारी जनतेची पायपीट थांबविण्यासाठी राज्य सरकारने अनेक ‘पाणी’दार निर्णय घेतले आहेत. टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना दिले आहेत. तसेच वीज बिलाअभावी ज्या पाणी योजना बंद आहेत. ती देयके सरकार भरणार आहे. या निर्णयामुळे टंचाईग्रस्त गावांतील लोकांची तहान भागणार आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील अध्यादेश २७ मे रोजी काढण्यात आला. राज्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू, जनाई-शिरसाई, पुरंदर, उरमोडी, मुक्ताईनगर या उपसा सिंचन योजनांची १५ मे ते १५ जून दरम्यानची विद्युत देयके टंचाई निधीतून अदा करण्यासही मंजुरी मिळाली आहे. राज्यातील हंगामी पाणी पुरवठा योजना तसेच प्रादेशिक पाणी योजना वीज देयके थकल्याने बंद आहेत. त्या परिसरात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. टँकरचा खर्च जर वीज बिलापेक्षा जास्त होत असेल तेथील वीज बिलेही भरण्यासही हिरवा कंदील दाखवला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या सार्वजनिक विहिरींना पाईपलाईन व विद्युत मोटारी बसविण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठीचा खर्चही टंचाई निधीतून भागविण्यात यावा, असेही अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) टँकरचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येईपर्यंत विलंब होतो. वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रशासनाला टंचाई निवारणासाठी तातडीने उपाययोजना करता येतील.या संदर्भातील अध्यादेश बुधवारी प्राप्त झाला आहे. -अनिल कवडे, जिल्हाधिकारी, नगर.