शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
3
२७७ प्रवासांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
4
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
5
फडणवीस, शिंदे, पवार, यांची पुस्तके कधी येणार?
6
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
7
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
8
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
9
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
10
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
11
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
12
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
13
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
14
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
15
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
16
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
17
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
18
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
19
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
20
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?

राज्य सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली: राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 18:14 IST

नागपूर पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी विदर्भासह राज्यातील अनेक मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. पण भाजप-शिवसेनेच्या राज्य सरकारने पुन्हा एकदा त्याच घोषणा, तीच जुमलेबाजी करून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राच्या तोंडाला फक्त पाने पुसली.

शिर्डी: नागपूर पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी विदर्भासह राज्यातील अनेक मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. पण भाजप-शिवसेनेच्या राज्य सरकारने पुन्हा एकदा त्याच घोषणा, तीच जुमलेबाजी करून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राच्या तोंडाला फक्त पाने पुसली.नागपूर आधिवेशनाची सांगता झाल्यानंतर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे म्हणाले, या अधिवेशनात महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची कमी होत असल्याकडे आम्ही सरकारचे लक्ष वेधले. पण सरकार त्याबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे या पुतळ्याबाबत सरकारची भूमिका संशयाच्या घेऱ्यात आहे.मराठा, मुस्लीम, धनगर आरक्षणाबाबतही आम्ही सरकारला जाब विचारला. पण सरकार याबाबतही स्पष्ट आश्वासन देऊ शकले नाही. शेतक-यांचे प्रश्न प्रामुख्याने बोंडअळी, मावा, तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांची समस्या आम्ही सरकारसमोर मांडली. पण सरकार त्यांना तातडीने ठोस दिलासा देऊ शकले नाही. पीक विम्यामध्ये फक्त कंपन्या नफा कमावतात, पण लाखो शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहतात. याबाबत देखील सरकारची भूमिका संदिग्ध होती.विरोधी पक्षांनी नवी मुंबईतील सिडकोचा घोटाळा उपस्थित केला. सरतेशेवटी सरकारला त्या भूखंडाच्या व्यवहारांवर स्थगिती आणावी लागली. मुंबईच्या नवीन विकास आराखड्यामुळे केवळ बिल्डरांचे कसे भले होईल, याबाबतही अधिवेशनात आम्ही सविस्तर भूमिका मांडली. विरोधी पक्षांनी राज्यातील अनेक प्रश्न लावून धरले असताना दुदैर्वाने सरकार मात्र गंभीर दिसले नाही. विदभार्साठी सरकारकडून २२ हजार कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर करीत असल्याचा आव आणला. पण यातील १३.५ हजार कोटी रुपये तर केंद्राचेच आहे. त्यामुळे यातून विदर्भाच्या हाती काहीही पडणार नाही.नागपूरला अधिवेशन घेण्यासाठी सरकारने प्रचंड आटापिटा केला. पण हे अधिवेशन जनतेच्या दृष्टीने निराशाजनक ठरले. पुढील अधिवेशन मुंबईला घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. खरिपाच्या हंगामानंतर हिवाळी अधिवेशनात निघणारे शेतकºयांचे मोर्चे टाळण्यासाठी म्हणून सरकारने हा खटाटोप केला आहे. त्या आंदोलनांना सामोरे जाण्याची सरकारची हिंमत राहिलेली नाही. सरकार कितीही पळ काढू पाहत असेल, वेळकाढूपणा करत असेल तरी आमच्या जनतेच्या प्रश्नांना सरकारला उत्तर द्यावेच लागेल.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील