शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
5
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
6
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
7
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
9
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
10
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
11
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
12
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
13
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
14
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
15
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
16
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
17
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
18
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
19
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
20
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बँक अपहार खटला दुसऱ्या न्यायालयासमोर चालवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:19 IST

राज्यातील मोठ्या नेत्यांवर शिखर बँकेत कर्जवाटपात अपहार केल्याचा आरोप आहे. बेकायदेशीर कर्जवाटपामुळे बँकेचे सुमारे २५ हजार कोटी रुपयांचे नुकसान ...

राज्यातील मोठ्या नेत्यांवर शिखर बँकेत कर्जवाटपात अपहार केल्याचा आरोप आहे. बेकायदेशीर कर्जवाटपामुळे बँकेचे सुमारे २५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार होती. याबाबत याचिका दाखल झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बँकेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संचालक मंडळांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करत गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत तपासाला सामोरे जाण्यास सांगितले होते.

त्यानंतर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने या गुन्ह्याचा तपास करून मुंबई सत्र न्यायालयात न्यायालयात आरोपपत्र सादर केले. या आरोपपत्रात मात्र संचालकांना दोष नसल्याचे नमूद करत गुन्ह्याचा तपास बंद (सी समरी रीपोर्ट) करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. तपास बंद करण्याचा अहवाल सादर करताना पोलिसांनी तपासाची महत्त्वाची कागदपत्रे मात्र सादर केली नाहीत. म्हणून तक्रारदार यांचे वकिलांनी या अहवालाला विरोध केला.

या खटल्याचे कामकाज सुरू असतानाच मूळ तक्रारदार अरोरा यांनी अचानक आपली भूमिका बदलून तपासावर समाधानी असून, मी माझे काम पाहणारे वकील यांना कार्यमुक्त केल्याचे पत्र ३ मे रोजी न्यायालयाला दिले. पोलीस व मूळ तक्रारदाराच्या या भूमिकेमुळे संशय निर्माण झाल्याचा दावा करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माणिक जाधव, शालिनी पाटील अहमदनगर येथील बबन कवाद यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करत हा खटला दुसऱ्या न्यायाधीशांपुढे हस्तांतरित करण्याची मागणी केली. तक्रारदारांच्या या अर्जावर येत्या १९ मे रोजी अतिरिक्त सत्र न्यायालय (मुंबई) यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. तक्रारदारांच्या वतीने ॲड. सतीश तळेकर हे बाजू मांडत आहेत.

..........

राज्य सहकारी बँकेतील अपहार प्रकरणात सध्याच्या मंत्रिमंडळातील अनेक बड्या नेत्यांची नावे आहेत. त्यामुळेच पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने राजकीय पुढाऱ्यांना वाचविणारा तपास अहवाल तयार केल्याचा आरोप मानिक जाधव, बबन कवाद यांनी केला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे.