शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

सहा हजार हेक्टरवर पेरणी

By admin | Updated: March 3, 2023 15:53 IST

अहमदनगर : खरीप हंगामासाठी ६ हजार १२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट आहे. या हंगामासाठी २ लाख ५५ हजार ४०० मेट्रीक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर : खरीप हंगामासाठी ६ हजार १२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट आहे. या हंगामासाठी २ लाख ५५ हजार ४०० मेट्रीक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे. बाजरी, भात, मका, कडधान्य, तेलबिया, सोयाबीन, कापूस (पाकीट) आदींच्या बियाणांची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. आगामी खरीप हंगामात शेतकर्‍यांना बी-बियाणे, खते आदी कृषी निविष्ठा वेळेवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृषी विभागाने आवश्यक तो समन्वय राखावा, म्हणजे खरीप हंगाम यशस्वी होण्यास मदत होईल, अशी आशा जिल्हाधिकारी कवडे यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, कृषी उपसंचालक शिरीष जाधव, कृषी विकास अधिकारी विलास नलगे, आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले आदींसह राजेश परजणे व इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कवडे म्हणाले, गेल्या काही वर्षातील अनुभव लक्षात घेता, शेतकर्‍यांना बियाणे, खते वेळेवर उपलब्ध व्हावीत, छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होऊ नये. कृषी निविष्ठा उपलब्धतेबाबत शेतकर्‍यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये, खते कधी आणि केव्हा उपलब्ध होतील याची माहिती शेतकर्‍यांना द्यावी. वितरण करताना कोणती कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे, याची पूर्वकल्पना देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आले आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच ५९२ मि.मी. पाऊस झालेला असला तरी आगामी अंदाजानुसार सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचे संकेत आहेत. अशा परिस्थितीत कृषी विभाग, कृषी विद्यापीठाने पीक पद्धतीबाबत शेतकर्‍यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, पिकांबाबात आकस्मिक योजना तयार हवी. पीक पद्धतीत बदलाबाबत जिल्हास्तरावर कार्यशाळा घेऊन जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कवडे यांनी दिले. कृषी निविष्ठा कृषी निविष्ठांच्या गुणनियंत्रणासाठी जिल्हा स्तरावर ६ गुणनियंत्रण निरीक्षक, उपविभागस्तरावर ८, तालुकास्तरावर २८ असे एकूण ४२ निरीक्षक आहेत. जिल्ह्यात परवानाधारक बियाणे वितरक १ हजार ८१६, खते वितरक १ हजार ८७७ तर किटकनाशके वितरक १ हजार ८८१ आहेत.