शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

पाणी योजनांसाठी सौर प्रकल्प

By admin | Updated: October 15, 2016 00:55 IST

अहमदनगर : जिल्ह्यात ४४ प्रादेशिक पाणी योजना कार्यान्वित आहे. या योजनांचा वीज बिलाचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात ४४ प्रादेशिक पाणी योजना कार्यान्वित आहे. या योजनांचा वीज बिलाचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रायोगिक तत्वावर संगमनेर तालुक्यातील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेची निवड के ली. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण योजनेतून आठ दिवसांत प्रस्ताव मंजूर करून घेण्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली. जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी योजनांच्या अडचणीवर चर्चा करून त्या सोडवण्यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेत या योजनांच्या पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, सचिव, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी तालुकानिहाय योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, सभापती शरद नवले, मिरा चकोर, नंदा वारे,सदस्य बाजीराव गवारे, दत्तात्रय सदाफुले, संभाजी दहातोंडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील ४४ पैकी ३९ योजना पाणी पुरवठा समिती मार्फ त चालवण्यात येत असून उर्वरित ५ ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावर चालवण्यात येत आहे. ४४ पाणी योजनांचे १६ कोटी ६५ लाख रुपयांचे वीज देयके थकीत आहे. हे अदा करण्यासाठी तरतूद करण्यासोबत योजनांची पाणीपट्टी वसुली, देखभाल दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याचे आवाहन आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत जवळपास सर्वच योजनांच्या चालकांकडून सरकारने पाणी योजना व्यापारी दरा ऐवजी कृषी दराने वीज बिल उपलब्ध करण्याची मागणी केली.योजना चालवत असतांना येणाऱ्या अडचणीचा पाढा यावेळी वाचून दाखवण्यात आला. पाणी योजनांना मीटर, फिल्टर यासह दुरूस्तीसाठी जि.प. देखभाल दुरूस्ती निधीतून पैसे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. (प्रतिनिधी)चांदा पाणी योजनेबाबत सदस्य दहातोंडे यांनी अडचणीचा पाढा वाचून दाखवला. या योजनेऐवजी पांढरीपूल एमआयडीसीतून पाणी देण्यात यावे, रांजणगाव पाणी योजनेचा साठवण तलाव चांदा गावाला द्यावा आणि चांदा ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगातून विहिरी खोदण्याची परवानगी मागितली.