शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

पाणी योजनांसाठी सौर प्रकल्प

By admin | Updated: October 15, 2016 00:55 IST

अहमदनगर : जिल्ह्यात ४४ प्रादेशिक पाणी योजना कार्यान्वित आहे. या योजनांचा वीज बिलाचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात ४४ प्रादेशिक पाणी योजना कार्यान्वित आहे. या योजनांचा वीज बिलाचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रायोगिक तत्वावर संगमनेर तालुक्यातील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेची निवड के ली. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण योजनेतून आठ दिवसांत प्रस्ताव मंजूर करून घेण्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली. जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी योजनांच्या अडचणीवर चर्चा करून त्या सोडवण्यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेत या योजनांच्या पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, सचिव, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी तालुकानिहाय योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, सभापती शरद नवले, मिरा चकोर, नंदा वारे,सदस्य बाजीराव गवारे, दत्तात्रय सदाफुले, संभाजी दहातोंडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील ४४ पैकी ३९ योजना पाणी पुरवठा समिती मार्फ त चालवण्यात येत असून उर्वरित ५ ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावर चालवण्यात येत आहे. ४४ पाणी योजनांचे १६ कोटी ६५ लाख रुपयांचे वीज देयके थकीत आहे. हे अदा करण्यासाठी तरतूद करण्यासोबत योजनांची पाणीपट्टी वसुली, देखभाल दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याचे आवाहन आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत जवळपास सर्वच योजनांच्या चालकांकडून सरकारने पाणी योजना व्यापारी दरा ऐवजी कृषी दराने वीज बिल उपलब्ध करण्याची मागणी केली.योजना चालवत असतांना येणाऱ्या अडचणीचा पाढा यावेळी वाचून दाखवण्यात आला. पाणी योजनांना मीटर, फिल्टर यासह दुरूस्तीसाठी जि.प. देखभाल दुरूस्ती निधीतून पैसे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. (प्रतिनिधी)चांदा पाणी योजनेबाबत सदस्य दहातोंडे यांनी अडचणीचा पाढा वाचून दाखवला. या योजनेऐवजी पांढरीपूल एमआयडीसीतून पाणी देण्यात यावे, रांजणगाव पाणी योजनेचा साठवण तलाव चांदा गावाला द्यावा आणि चांदा ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगातून विहिरी खोदण्याची परवानगी मागितली.