शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांचे विचार म्हणजेच समाजवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:20 IST

संगमनेर : सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माउलींनी ‘दुरितांचे तिमिर जावो, विश्वे स्वधर्मे सूर्ये पाहो। जो जे वांछिल तो ते लाहो, ...

संगमनेर : सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माउलींनी ‘दुरितांचे तिमिर जावो, विश्वे स्वधर्मे सूर्ये पाहो। जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात ।।’ आणि चारशे वर्षांपूर्वी जगद्गुरू तुकोबारायांनी ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले। तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा ।।’ असा विचार सांगितला. हा विचार म्हणजेच समाजवाद होय. समाजवाद हा शब्द नवीन असेल, पण समाजवादी विचार हा फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे, असे ज्येष्ठ शिक्षक नेते हिरालाल पगडाल म्हणाले.

जयहिंद लोकचळवळ आयोजित संदीप खताळ यांच्या स्मृतीनिमित्त संविधान जागर ऑनलाइन व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना ‘लोकशाही व समाजवाद’ या विषयावर पगडाल बोलत होते. पगडाल म्हणाले, जोपर्यंत काही माणसे दुःखी, उपाशी, वंचित, पीडित नाडीत आहेत आणि काही माणसे अवैद्य मार्गाने संपत्ती कमावतात. शोषण, लूट, नफेखोरी, साठेबाजी आणि कर चुकवेगिरी करतात, तोपर्यंत समाजवादी विचार अस्तित्वात राहतील. शोषितांना, वंचितांना, गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत राहणार आहे. लोकशाहीत भले अनंत दोष असतील, परंतु लोकशाहीला पर्याय नाही, कारण फक्त लोकशाही व्यवस्थेतच सरकारच्या विरोधात दाद मागण्याचा, आंदोलन, टीका करण्याचा अधिकार जनतेला असतो. तो इतर कोणत्याही शासन व्यवस्थेत नाही.

भारतीय लोकशाही जगातील यशस्वी लोकशाही असून भारतीय नागरिक हे परिपक्व आणि जागृत मतदार आहेत. हे गेल्या सत्तर वर्षांच्या वाटचाली वरून सिद्ध झाले आहे. भारतीय मतदारांनी दर दहा वर्षांनी प्रस्थापित सत्तेला झटका दिलेला आहे. भारतात शांततामय मार्गाने अनेकदा या पक्षांकडून त्या पक्षाकडे सत्तांतर झाले आहे. गेल्या सत्तर वर्षांत अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजा भागवून देशातील दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आपल्याला यश आले आहे. हा लोकशाही समाजवादी विचाराचाच एक भाग आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी संदीप खताळ यांच्या स्मृतीस अभिवादन करून व्याख्यानमाला आयोजित करण्याचा हेतू स्पष्ट केला. ॲड.समीर लामखडे यांनी प्रास्ताविक केले, राजीवकुमार साळवे यांनी आभार मानले. समीर कडलग यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.