शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांचे विचार म्हणजेच समाजवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:20 IST

संगमनेर : सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माउलींनी ‘दुरितांचे तिमिर जावो, विश्वे स्वधर्मे सूर्ये पाहो। जो जे वांछिल तो ते लाहो, ...

संगमनेर : सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माउलींनी ‘दुरितांचे तिमिर जावो, विश्वे स्वधर्मे सूर्ये पाहो। जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात ।।’ आणि चारशे वर्षांपूर्वी जगद्गुरू तुकोबारायांनी ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले। तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा ।।’ असा विचार सांगितला. हा विचार म्हणजेच समाजवाद होय. समाजवाद हा शब्द नवीन असेल, पण समाजवादी विचार हा फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे, असे ज्येष्ठ शिक्षक नेते हिरालाल पगडाल म्हणाले.

जयहिंद लोकचळवळ आयोजित संदीप खताळ यांच्या स्मृतीनिमित्त संविधान जागर ऑनलाइन व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना ‘लोकशाही व समाजवाद’ या विषयावर पगडाल बोलत होते. पगडाल म्हणाले, जोपर्यंत काही माणसे दुःखी, उपाशी, वंचित, पीडित नाडीत आहेत आणि काही माणसे अवैद्य मार्गाने संपत्ती कमावतात. शोषण, लूट, नफेखोरी, साठेबाजी आणि कर चुकवेगिरी करतात, तोपर्यंत समाजवादी विचार अस्तित्वात राहतील. शोषितांना, वंचितांना, गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत राहणार आहे. लोकशाहीत भले अनंत दोष असतील, परंतु लोकशाहीला पर्याय नाही, कारण फक्त लोकशाही व्यवस्थेतच सरकारच्या विरोधात दाद मागण्याचा, आंदोलन, टीका करण्याचा अधिकार जनतेला असतो. तो इतर कोणत्याही शासन व्यवस्थेत नाही.

भारतीय लोकशाही जगातील यशस्वी लोकशाही असून भारतीय नागरिक हे परिपक्व आणि जागृत मतदार आहेत. हे गेल्या सत्तर वर्षांच्या वाटचाली वरून सिद्ध झाले आहे. भारतीय मतदारांनी दर दहा वर्षांनी प्रस्थापित सत्तेला झटका दिलेला आहे. भारतात शांततामय मार्गाने अनेकदा या पक्षांकडून त्या पक्षाकडे सत्तांतर झाले आहे. गेल्या सत्तर वर्षांत अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजा भागवून देशातील दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आपल्याला यश आले आहे. हा लोकशाही समाजवादी विचाराचाच एक भाग आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी संदीप खताळ यांच्या स्मृतीस अभिवादन करून व्याख्यानमाला आयोजित करण्याचा हेतू स्पष्ट केला. ॲड.समीर लामखडे यांनी प्रास्ताविक केले, राजीवकुमार साळवे यांनी आभार मानले. समीर कडलग यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.