शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

समाजकार्याची सुरूवात स्वत:पासून करावी - डॉ. संजय भट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 20:30 IST

समाजकार्यात पारंपरिक ज्ञानाला अधिक महत्व देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्वत:पासून समाजकार्याची सुरूवात करावी. समाजाच्या तळाशी जावून सद्यस्थिती समजावून घेत, व्यावसायिक नितीमूल्ये अंगिकारत नावीन्यपूर्ण उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. संजय भट्ट यांनी केले.

ठळक मुद्देसीएसआरडीमधील राष्ट्रीय परिषदेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : समाजकार्यात पारंपरिक ज्ञानाला अधिक महत्व देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्वत:पासून समाजकार्याची सुरूवात करावी. समाजाच्या तळाशी जावून सद्यस्थिती समजावून घेत, व्यावसायिक नितीमूल्ये अंगिकारत नावीन्यपूर्ण उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. संजय भट्ट यांनी केले.येथील बी.पी.एच.ई. सोसायटीचे सी.एस.आर.डी. व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतातील समाजकार्य पद्धती : आव्हाने व नावीन्यता’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, कार्यक्रम समन्वयक डॉ. जेमोन वर्गीस, प्रा. सुरेश मुगुटमल आदी उपस्थित होते. प्रारंभी वर्गीस यांनी राष्ट्रीय परिषदेचा अहवाल मांडला. सामाजिक न्याय, कंपन्यांची सामाजिक बांधिलकी, आदर्श गाव, वंचितांचे प्रश्न, सामाजिक अस्थिरता, महिलांवरील अन्याय, अत्याचार, मानवाधिकार, आधुनिक शिक्षण पद्धती,आदिवासी समुदायाच्या समस्या, सांस्कृतिक विविधता, समाजकार्य शिक्षणातील क्षेत्रकार्याची भूमिका, ग्रामीण विकासात लोकांचा सक्रिय सहभाग, शाश्वत विकास, पर्यावरणाचे प्रश्न, सामाजिक एकात्मता व सामुहिक जबाबदारी अशा अनेक विषयांवर परिषदेत विचारमंथन झाले.सुरेश पठारे यांनी परिषदेत सहभागी झालेल्या विद्यार्थी, प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी अनेक विषयांवर विचारमंथन करून पुढील काळात अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचे ठरले. परिषदेत अनेक विचारवंताशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यातून समर्पित समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळाली, असा अभिप्राय विद्यार्थी राहुल सरवदे, दिल्ली येथील डॉ. अतुल प्रताप यांनी दिला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरuniversityविद्यापीठ