शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

समाजकार्याची सुरूवात स्वत:पासून करावी - डॉ. संजय भट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 20:30 IST

समाजकार्यात पारंपरिक ज्ञानाला अधिक महत्व देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्वत:पासून समाजकार्याची सुरूवात करावी. समाजाच्या तळाशी जावून सद्यस्थिती समजावून घेत, व्यावसायिक नितीमूल्ये अंगिकारत नावीन्यपूर्ण उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. संजय भट्ट यांनी केले.

ठळक मुद्देसीएसआरडीमधील राष्ट्रीय परिषदेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : समाजकार्यात पारंपरिक ज्ञानाला अधिक महत्व देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्वत:पासून समाजकार्याची सुरूवात करावी. समाजाच्या तळाशी जावून सद्यस्थिती समजावून घेत, व्यावसायिक नितीमूल्ये अंगिकारत नावीन्यपूर्ण उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. संजय भट्ट यांनी केले.येथील बी.पी.एच.ई. सोसायटीचे सी.एस.आर.डी. व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतातील समाजकार्य पद्धती : आव्हाने व नावीन्यता’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, कार्यक्रम समन्वयक डॉ. जेमोन वर्गीस, प्रा. सुरेश मुगुटमल आदी उपस्थित होते. प्रारंभी वर्गीस यांनी राष्ट्रीय परिषदेचा अहवाल मांडला. सामाजिक न्याय, कंपन्यांची सामाजिक बांधिलकी, आदर्श गाव, वंचितांचे प्रश्न, सामाजिक अस्थिरता, महिलांवरील अन्याय, अत्याचार, मानवाधिकार, आधुनिक शिक्षण पद्धती,आदिवासी समुदायाच्या समस्या, सांस्कृतिक विविधता, समाजकार्य शिक्षणातील क्षेत्रकार्याची भूमिका, ग्रामीण विकासात लोकांचा सक्रिय सहभाग, शाश्वत विकास, पर्यावरणाचे प्रश्न, सामाजिक एकात्मता व सामुहिक जबाबदारी अशा अनेक विषयांवर परिषदेत विचारमंथन झाले.सुरेश पठारे यांनी परिषदेत सहभागी झालेल्या विद्यार्थी, प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी अनेक विषयांवर विचारमंथन करून पुढील काळात अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचे ठरले. परिषदेत अनेक विचारवंताशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यातून समर्पित समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळाली, असा अभिप्राय विद्यार्थी राहुल सरवदे, दिल्ली येथील डॉ. अतुल प्रताप यांनी दिला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरuniversityविद्यापीठ