शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

समाजकार्याची सुरूवात स्वत:पासून करावी - डॉ. संजय भट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 20:30 IST

समाजकार्यात पारंपरिक ज्ञानाला अधिक महत्व देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्वत:पासून समाजकार्याची सुरूवात करावी. समाजाच्या तळाशी जावून सद्यस्थिती समजावून घेत, व्यावसायिक नितीमूल्ये अंगिकारत नावीन्यपूर्ण उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. संजय भट्ट यांनी केले.

ठळक मुद्देसीएसआरडीमधील राष्ट्रीय परिषदेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : समाजकार्यात पारंपरिक ज्ञानाला अधिक महत्व देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्वत:पासून समाजकार्याची सुरूवात करावी. समाजाच्या तळाशी जावून सद्यस्थिती समजावून घेत, व्यावसायिक नितीमूल्ये अंगिकारत नावीन्यपूर्ण उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. संजय भट्ट यांनी केले.येथील बी.पी.एच.ई. सोसायटीचे सी.एस.आर.डी. व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतातील समाजकार्य पद्धती : आव्हाने व नावीन्यता’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, कार्यक्रम समन्वयक डॉ. जेमोन वर्गीस, प्रा. सुरेश मुगुटमल आदी उपस्थित होते. प्रारंभी वर्गीस यांनी राष्ट्रीय परिषदेचा अहवाल मांडला. सामाजिक न्याय, कंपन्यांची सामाजिक बांधिलकी, आदर्श गाव, वंचितांचे प्रश्न, सामाजिक अस्थिरता, महिलांवरील अन्याय, अत्याचार, मानवाधिकार, आधुनिक शिक्षण पद्धती,आदिवासी समुदायाच्या समस्या, सांस्कृतिक विविधता, समाजकार्य शिक्षणातील क्षेत्रकार्याची भूमिका, ग्रामीण विकासात लोकांचा सक्रिय सहभाग, शाश्वत विकास, पर्यावरणाचे प्रश्न, सामाजिक एकात्मता व सामुहिक जबाबदारी अशा अनेक विषयांवर परिषदेत विचारमंथन झाले.सुरेश पठारे यांनी परिषदेत सहभागी झालेल्या विद्यार्थी, प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी अनेक विषयांवर विचारमंथन करून पुढील काळात अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचे ठरले. परिषदेत अनेक विचारवंताशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यातून समर्पित समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळाली, असा अभिप्राय विद्यार्थी राहुल सरवदे, दिल्ली येथील डॉ. अतुल प्रताप यांनी दिला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरuniversityविद्यापीठ