शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

सोशल मीडियाच्या मदतीने अनाथ भावा-बहिणीने शोधलं आपलं गाव, आडनाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 11:12 IST

लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. आजोबाही आश्रमशाळेत सोडून निघून गेले.

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. आजोबाही आश्रमशाळेत सोडून निघून गेले. बारावी पास झाल्यानंतर आकाश आणि प्रिया या भावंडांना पुढील शिक्षणासाठी जातीचा दाखला हवा होता. त्यांनी सोशल मीडियाच्या मदतीने गावाचा शोध घेऊन ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर जातीचा दाखल मिळविला.त्या दोन मुलांचे पंजोबा श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील गजाराम राणू साळुंके (चर्मकार समाज) पोटाची खळगी भरण्यासाठी सुरतला (गुजरात) गेले होते. तिकडेच लहू साळुंके व अनिता साळुंके यांना आकाश व प्रिया ही दोन मुले झाली. अगोदर आईचे छत्र हरपले. त्यानंतर पाच-सहा महिन्यात वडिलांचे निधन झाले. ही मुलं पोरकी झाली. त्या दोघांचे आजोबा बापूराव साळुंके यांनी दोन्ही मुलांना पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रूक येथील माहेर आश्रमशाळेत प्रवेश दिला.आश्रमशाळेतील अधीक्षकांनी हिंदू चर्मकार म्हणून त्यांच्या जातीची नोंद केली. त्यानंतर आकाश व प्रिया एकाच वर्गात शिकले. नुकतेच दोघेही बारावी उत्तीर्ण झाले. त्यांना पुढील शिक्षणासाठी जातीच्या दाखल्याची गरज होती. त्यांनी कधीही आपले गाव पाहिले नव्हते. गावात कुणाची ओळख ना पाळख अशा परिस्थितीत त्यांनी सोशल मीडियावर गाव, आडनाव शोधले. त्यांना साजन साळुंके या व्यक्तीचा सुगावा लागला. त्यानंतर दोघे उक्कडगावला (ता.श्रीगोंदा) आले. त्यांनी बापूराव हे आजोबा असल्याचे सांगितले. त्यांनी आकाश व प्रियाला सहारा दिला होता.गावातील ग्रामपंचायतमध्ये आजोबांच्या ना वडिलांच्या जातीच्या दाखल्याची नोंद. पणजोबांच्या दाखल्यावरून जातीचा काहीसा सुगावा लागला. पण या मुलांना रहिवासी व जातीचा दाखला देण्यासंदर्भात ग्रामसेवक संदीप लगड यांना अडचणी आल्या.ग्रामपंचायत सदस्यांनी यासाठी बैठक बोलविली. त्या बैठकीत आकाश व प्रिया मूळ उक्कडगाव येथील रहिवासी असून त्यांची जात हिंदू चर्मकार आहे, असा ठराव करण्यात आला. त्यामुळे त्यांना जातीचा दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आकाशाला बीबीए तर प्रियाला बॅँकिंग क्षेत्रात अधिकारी व्हायचे आहे.आमची आता कष्ट करून शिकण्याची तयारी आहे, असे या भावंडांनी सांगितले. भविष्यात त्यांना शैक्षणिक खर्चाची अडचण आली तर सर्व खर्च अग्निपंख फाउंडेशन करणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा