शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

...तर मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल; सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 14:57 IST

नगर जिल्ह्यातील सर्व ड्रीम प्रोजेक्टसाठी केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याची परवानगी घ्यावी लागते. कारण जिल्ह्यातील प्रत्येक काम हे संरक्षण खात्याशी निगडीत आहे. यासाठी मला प्रत्येक वेळी दिल्लीला जावे लागते. यासाठी आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल, असे प्रतिपादन नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.  

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील सर्व ड्रीम प्रोजेक्टसाठी केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याची परवानगी घ्यावी लागते. कारण जिल्ह्यातील प्रत्येक काम हे संरक्षण खात्याशी निगडीत आहे. यासाठी मला प्रत्येक वेळी दिल्लीला जावे लागते. यासाठी आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल, असे प्रतिपादन नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.  

नगर-जामखेड राष्ट्रीय मार्गाच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी (दि.२४ आॅक्टोबर) टाकळीकाझी येथे झाले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावरही टीका केली. 

नगर जिल्ह्यातील नगर-जामखेड रोड, बाह््यवळण रस्ता, के. के. रेंज, उढ्ढाण पूल व प्रत्येक मोठी विकास कामे ही संरक्षण खात्याशी निगडीत आहेत. या कामांसाठी मलाही वारंवार दिल्लीला जावे लागते. यामुळे आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल. तरच जिल्ह्यातील रखलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या कामांना गती येईल, असेही डॉ. विखे यावेळी म्हणाले.

जिल्ह्यातील सध्याचे तीन नवे मंत्री आणि काही आमदार आपण किती साधे आहोत याचा आव आणीत आहेत. हा फक्त प्रसिध्दीचा स्टंट आहे. राज्याचा पैसा खाऊन तुम्ही चप्पल घालून फिरत असला म्हणून तुम्ही संत झालात काय? असा सवाल विखे यांनी केला. तर दुसºयाच्या कामांचे श्रेय घेतले तर मतदारसंघात येऊन पोलखोल करील, असा इशाराही विखे यांनी मंत्री गडाख, तनपुरे यांचे नाव न घेताना दिला. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेPoliticsराजकारण