शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
2
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
3
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
4
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
5
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
6
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
7
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
8
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या
9
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
10
Crocodile Torture: वसाहतीत घुसलेल्या मगरीसोबत तरुणांचं अमानुष कृत्य, आरोपींचा शोध सुरू!
11
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
12
भारतीय पुरुषांच्या 'स्पर्म क्वालिटी'ने अभ्यासक अवाक्; रिपोर्टमधून 'जगावेगळं'च चित्र समोर
13
आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?
14
काही सेकंदात होतात जळून खाक, खाजगी बसला आग लागल्यावर प्रवाशांचं वाचणं का होतं कठीण?
15
अरे बापरे! कर्मचाऱ्याच्या प्रेमात वेडी झाली मालकीण; लग्नानंतर 'त्याने'च लावला कोट्यवधींचा चुना
16
मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...
17
इराणमध्ये महागाईचा कहर! हप्त्यांवर कबरीच्या दगडांची खरेदी; कारण जाणून घ्या
18
VIDEO: विराट कोहलीचा 'माईंड गेम'! आधी ट्रेव्हिस हेडशी गप्पा अन् मग पुढच्याच चेंडूवर विकेट
19
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
20
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?

नागपंचमीला सापाला पुजले जाते, मग इतर दिवशी का मारले जाते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:25 IST

कोपरगाव : महाराष्ट्रात सर्वत्र नागपंचमीनिमित्त नागोबा देवतेचे पूजन अनादिकाळापासून चालत आलेल्या प्रथेनुसार आजही सर्वत्र होत आहे. मनुष्यप्राणी हा निसर्गपूजक ...

कोपरगाव : महाराष्ट्रात सर्वत्र नागपंचमीनिमित्त नागोबा देवतेचे पूजन अनादिकाळापासून चालत आलेल्या प्रथेनुसार आजही सर्वत्र होत आहे. मनुष्यप्राणी हा निसर्गपूजक असल्याने निसर्गातील प्रत्येक घटकाचा आदरपूर्वक सन्मान करत आलेला आहे. सापाची पूजा ही ऋण बाळगून कृतज्ञता वक्त करण्याचाच एक भाग आहे. मात्र, याच सापांची नागपंचमीला पूजा होते आणि इतर दिवशी का मारले जाते, हे आजतागायत न उलगडणारे कोडे आहे.

राज्यात आढळणाऱ्या सापाच्या एकूण प्रजातींमध्ये प्रामुख्याने विषारी आणि बिनविषारी सापाची वर्गवारी केली जाते. साप हा निसर्गातील घटक आहे, तसेच सापाबद्दल आजही अनेक अंधश्रद्धा आहेत. यातूनच खऱ्या अर्थाने सापाला मारले जाते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सापांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, सर्प मित्र संघटनांच्या माध्यमातून सापांना जीवनदान दिले जात असल्यामुळे सापांचे प्रमाण वाढू लागले आहे.

.........

जिल्ह्यात आढळणारे विषारी साप

नाग, मण्यार, घोणस, फुरसे.

............

जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप

धामण, मांडूळ, तस्कर, गवत्या, दिवड, कवड्या, वाळा.

............

साप आढळला तर...

घरात किंवा शेतात साप आढळला, तर त्यास मारून न टाकता तात्काळ एखाद्या सर्पमित्राशी संपर्क केल्यास तो साप विषारी आहे की बिनविषारी, हे समजू शकते. त्यानंतर साप पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले जाते. घरात साप आढळून आला तर त्याच्यापासून पाच ते सहा फूट अंतर राखून उभे राहावे. घोणस जातीच्या साप हा मनुष्यावर हल्ला करू शकतो. घराच्या परिसरात ज्या ठिकाणाहून साप येण्याची शक्यता वाटते, त्या ठिकाणी रॉकेल आणि पाणी शिंपडावे, तसेच साप चावल्यानंतर नागरिकांचा भीतीपोटीच मृत्यू होतो. त्यामुळे साप चावल्यानंतर भीती न बाळगता रुग्णालयात उपचार घेणे महत्त्वाचे ठरते.

.............

साप हा तर शेतकऱ्याचा मित्र

उंदराची एक जोडी वर्षाला ९३० पिलांना जन्म देते. जगात उत्पन्न होणाऱ्या ऐकून अन्नधान्यापैकी २० टक्के धान्य उंदरांद्वारे नष्ट होते. धामण जातीच्या सापाला सतत खायला लागत असल्याने उंदीर, बेडूक तसेच विषारी सापाची, अंडी, पिले हे त्याचे प्रमुख खाद्य असते. त्यामुळे धामण साप हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे.

.................

अनादिकाळापासून साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतात साप असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण, सापामुळे शेतातील उंदरांचा नायनाट होतो. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान होत नाही. सापांना जरी शेतकऱ्यांचा मित्र म्हटले तरी माणूसच खरा सापाचा शत्रू आहे. साप दिसला की, लगेच आपण काठी घेऊन धावतो. सापांबद्दल पूर्वीपासून बऱ्याच अंधश्रद्धा आहेत, तसेच साप हा निसर्गचक्रातील महत्त्वाचा वन्यजीव आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, तसेच सापांच्या विषापासून वेगवेगळी औषधी बनविल्या जातात.

-अरुण दवणे, सर्पमित्र, वारी ता. कोपरगाव

..............

स्टार १०३९