शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

नगर शहरात आता स्मार्ट सुरक्षा!

By admin | Updated: April 24, 2016 23:13 IST

अहमदनगर : पोलीस दलाच्या पुढाकाराने शहरात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

अहमदनगर : पोलीस दलाच्या पुढाकाराने शहरात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच गुन्हा घडणार नाही, याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नागरिकांनी सुरक्षेबाबत काय काळजी घ्यावी, यासाठी चौकाचौकात सार्वजनिक उद्घोषणा करणारी ध्वनी यंत्रणा (पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टिम) लवकरच बसविण्यात येणार आहे. यामुळे नगर शहर आता सुरक्षेच्या दृष्टिने स्मार्ट सिटी होणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी नगर शहराला सुरक्षेच्या दृष्टिने स्मार्ट करण्यासाठी पाऊल उचलले आहे. सर्वात आधी प्रत्येक पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आता सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठ, मुख्य रस्ते, वसाहती आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. गुन्हा टाळता येत नसला तरी घडलेल्या गुन्ह्याचा तपास वेगाने होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तत्काळ उपयोग होत असल्याने अनेक गुन्ह्यांचा उलगडा होताना दिसून आले आहे. अपार्टमेंट, सोसायटी आणि व्यापाऱ्यांनाही कॅमेरे बसविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शहरात कॅमेरे बसविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्रिपाठी यांनी व्यक्त केली.प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रारदारांसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांसाठी खास पोलीस दलाने फेसबुक पेज सुरू केले आहे. नगर जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळही कार्यान्वीत करण्यात आले असून त्यावर नागरिक भेट देत आहेत. तक्रारी देण्यासाठी व्हॉटस् अ‍ॅप नंबरची घोषणा केलेली आहे. फेसबुक पेजवरून नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले जाते. हेच मार्गदर्शन किंवा उपाययोजनांबाबतची माहिती आता चौकाचौकातील सिग्नलवरून ऐकविण्यात येणार आहे. त्यासाठी उद्घोषणा करणारी ध्वनिक्षेपक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेच्या खर्चासाठी जिल्हा नियोजनला प्रस्ताव देण्यात आला आहे. ही यंत्रणा नगर शहरात लवकरच ती कार्यान्वीत करण्यात येणार असल्याचे डॉ. त्रिपाठी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गस्तीसाठी फिरणाऱ्या वाहनांना व्हेकल ट्रॅकिंग सिस्टिम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे कोणते पोलीस कर्मचारी कुठे काम करतात, याची माहिती मिळणार आहे. (प्रतिनिधी)सायबर लॅब मंजूरराज्यात पाच ठिकाणी सायबर लॅब स्थापन करण्याची शासनाने घोषणा केली आहे. त्यातील पाच महत्त्वाच्या शहरांमध्ये अहमदनगर शहराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा उलगडा नगरमध्ये करणे शक्य होणार आहे. यामुळे पोलीस दलाचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. डिजिटल रेकॉर्डप्रत्येक गुन्ह्याचे डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. सीसीटीएनएस प्रोजेक्ट हा प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला होता. त्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्याने सध्या हा प्रकल्प बंद आहे. दिल्ली येथूनच सर्व्हर बंद आहे. सर्व पोलीस ठाण्यांचे संगणकीकरण झाल्याने आणि सर्व्हर सुरू झाल्यानंतर सर्व पोलीस ठाणे आॅनलाईन दिसणार आहेत. जिल्ह्यात किती तक्रारी आहेत, कोणत्या तक्रारी कशा आहेत, याबाबत तपशीलवार डाक्युमेंटरी केली जाणार आहे. या रेकॉर्डमधून गुन्हेगार शोधण्यास मदत होणार आहे.