शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

साठ टक्के रुग्णांना आधीपासूनच होते आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST

अहमदनगर : जिल्ह्यात आतापर्यंत साडेपाच हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील ६० टक्के रुग्णांना आधीपासूनच वेगवेगळे आजार होते, ...

अहमदनगर : जिल्ह्यात आतापर्यंत साडेपाच हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील ६० टक्के रुग्णांना आधीपासूनच वेगवेगळे आजार होते, तर सहव्याधी नसलेल्या ४० टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. साडेपाच हजारांमध्ये तीन हजारांपेक्षा जास्त पुरुषांचा, तर दीड हजारांपेक्षा जास्त महिलांचा मृत्यू झाला आहे. कोरोनासह सहव्याधी असलेल्या ३३०० पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून, २२०० पेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजार नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या आणि ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांनाही कोरोनाने हिरावले आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त होते. रक्तातील साखर, रक्तदाब आदी सहव्याधी असलेल्या ६० टक्के रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्यातील काही रुग्णांचा पहिल्या पाच दिवसांमध्येच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

-----

उपचाराच्या २४ तासांमध्ये दोनशेपेक्षा जास्त जणांचा मृत्यू

दवाखान्यात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना २४ तास उपचार घेतल्यानंतर मृत्यू झाला, अशी रुग्णसंख्या दोनशेच्यावर आहे. एक ते पाच दिवस झाल्यानंतर एक हजार जणांचा, सहा ते दहा दिवसांच्या उपचारादरम्यान एक हजार जणांचा आणि दहा दिवसांपेक्षा अधिक दिवस उपचार घेतल्यानंतर सातशेपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे.

--------

सहव्याधीपेक्षा कोरोनामुळेच अधिक मृत्यू

सहव्याधी असलेल्या ६० टक्के रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ४० टक्के रुग्णांना सहव्याधी नव्हत्या. म्हणजे रक्तामधील साखर, रक्तदाब व उच्च रक्तदाबाचे आजार नव्हते किंवा अन्य आजारही नव्हते. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ४५ ते ५५ या वयोगटांतील नागरिकांचा जास्त समावेश आहे.

------------

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये कोणत्या आजारांमुळे किती जणांचा मृत्यू झाला, अशी निश्चित आकडेवारी समोर आलेली नसली, तरी ढोबळ मानाने मृत्यू झालेल्यांपैकी ६० टक्के नागरिकांना आधीपासूनच व्याधी असल्याचे दिसून आले आहे. रक्तातील साखर, रक्तदाब, आधी येऊन गेलेला हृदयविकारधक्का ही त्यामागील कारणे होती. वयापेक्षा जास्त वजन असणे म्हणजे लठ्ठपणा हेही अनेकांच्या मृत्यूचे कारण ठरले आहे. लठ्ठ असलेल्यांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूचा दर जास्त होता.

-डॉ. सचिन वहाडणे, सचिव, आयएमए, अहमदनगर शाखा

---------

डमी