अहमदनगर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश देण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्र्यांनी केली. त्याअनुषंगाने नगर जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे एकूण ६ लाख २१ हजार विद्यार्थी पुढील वर्गात जाणार आहेत.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे पहिली ते आठवीचे सर्व विद्यार्थी कोणतीही परीक्षा न होता पुढच्या वर्गात प्रवेशित होतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी घेतला.
दरम्यान, नगर जिल्ह्यात २०१९-२० च्या पटसंख्येनुसार सर्व व्यवस्थापनाच्या ५ हजार ३७६ शाळा असून, यात पहिली ते आठवीचे ३ लाख ३६ हजार ७४६ मुले आणि २ लाख ८४ हजार ९३३ मुली आहेत. हे सर्व ६ लाख २१ हजार ६७९ विद्यार्थी कोणतेही परीक्षा न होता पुढील वर्गात प्रवेशित होणार आहेत.
------------
पहिली ते आठवीची तालुकानिहाय विद्यार्थीसंख्या
अकोले - ३६ हजार ५९१
राहाता - ४६ हजार ४६८
राहुरी - ४४ हजार ८५२
संगमनेर - ६३ हजार ७७०
शेवगाव - ३५ हजार ५०४
श्रीगोंदा - ३७ हजार ६९५
श्रीरामपूर - ३९ हजार ३८८
जामेखड - २० हजार ९००
कर्जत - २९ हजार ३७१
कोपरगाव - ४६ हजार ९५४
नगर - ४६ हजार २९७
नेवासा - ५२ हजार १८८
पारनेर - ३४ हजार ३६७
पाथर्डी - ३४ हजार ४४४ महापालिका - ५२ हजार ८९०