शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

नवरदेवाच्या ताटाला वटकण लावण्यावरून रेशीमगाठ सुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST

कर्जत : लग्न समारंभ आटोपल्यानंतर नववधू आणि वर यांना जेवू घातले जाते. यावेळी नवरदेवाच्या ताटाला वधू पक्षाकडून वटकण (काही ...

कर्जत : लग्न समारंभ आटोपल्यानंतर नववधू आणि वर यांना जेवू घातले जाते. यावेळी नवरदेवाच्या ताटाला वधू पक्षाकडून वटकण (काही रक्कम देणे) लावण्याची प्रथा समाजात रूढ आहे. मात्र, हौसेने करावयाची ही प्रथा विवाहबद्ध झालेल्या वधू-वरांची रेशीमगाठ सोडण्यास कारणीभूत ठरल्याचा प्रकार कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे रविवारी (दि.२०) घडला.

सिद्धटेक येथील मुलगा रविवारी नांदगाव येथील मुलीशी विवाहबद्ध झाला. लग्न समारंभ उत्साहात साजरा झाला. पुढे कन्येला पाठवणीच्या पूर्वी वधू-वरांना जेवू घालण्याचा कार्यक्रम सुरू झाला. प्रथेप्रमाणे वधू पक्षाकडून २०० रुपये वटकण म्हणून ताटाला लावण्यात आले. तेथेच वाद पेटला.

वटकण लावलेल्या २०० रुपयांवर वर पक्षाकडील लोकांचे समाधान झाले नाही. त्यांच्याकडून वाढीव पैशाची मागणी होऊ लागली. वधू पक्षाने त्यास स्पष्ट नकार दिला. रुसवे फुगवे टोकाला गेले. वधू पित्याने मुलीची पाठवणी न करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, ग्रामस्थांनी त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ हा गोंधळ सुरूच राहिला. यात वर पक्षाने अखेर पोलीस स्टेशन गाठले.

हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने हे तत्काळ विवाहस्थळी पोहोचले. त्यांनी सर्व प्रकार समजून घेतला. वधू पित्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते निर्णयावर ठाम होते. नववधू सज्ञान असल्याने पोलीस अधिकारी माने यांनी शेवटी नववधूचा निर्णय विचारला. मात्र, तिनेही सासरला न जाण्याचा निर्णय स्पष्ट केला. शेवटी वर पक्षाकडील मंडळींना वधूविना घर गाठावे लागले.