शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आदिवासींच्या दाखल्यांसाठी श्रीरामपुरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 21:07 IST

जातीच्या दाखल्याअभावी आदिवासी विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देआदिवासींच्या दाखल्यांसाठी एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.पंधरा दिवसात दाखले न मिळाल्यास प्रांताधिका-यांना दालनातच कोंडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.प्रांताधिकारी चव्हाण यांनी आदिवासींचे मेळावे घेऊन त्वरित कार्यवाही केली जाईल व कुणाचीही अडवणूक होणार नाही, असे आश्वासन दिले.

श्रीरामपूर : जातीच्या दाखल्याअभावी आदिवासी विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पंधरा दिवसात दाखले न मिळाल्यास प्रांताधिका-यांना दालनातच कोंडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांना ढवळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी पवन सोनवणे, रतन सोनवणे, अनिल जाधव, अशोक शिंदे, देवीदास माळी, राजेंद्र भालेराव, अनिल मोरे, दीपक ठाकरे, अनिल रोकडे, उत्तम पवार आदी उपस्थित होते.प्रांताधिकारी चव्हाण यांनी जातीच्या दाखल्यांसाठी जुने पुरावे आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र ढवळे यांनी त्याला विरोध केला. सरकारने आदिवासींना दाखले देण्यासाठी परिपत्रक काढून सुधारणा केली आहे. ग्रामसेवक, मुख्याध्यापक, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी व पंचांनी पंचनामा केल्यानंतर तसेच कुटुंबातील पूर्वीचा दाखला असेल तर अन्य पुरावे न बघता दाखले देण्याची तरतूद परिपत्रकात करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी झाली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. प्रांताधिकारी चव्हाण यांनी आदिवासींचे मेळावे घेऊन त्वरित कार्यवाही केली जाईल व कुणाचीही अडवणूक होणार नाही, असे आश्वासन दिले.आदिवासींची पिळवणूक अजूनही संपलेली नाही. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. मात्र जातीचे दाखले देण्यास विलंब केल्याने सरकारी धोरणाला अधिकारीच विरोध दर्शवित आहेत. शेती महामंडळाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन शेती कसण्यास आदिवासींनी प्रारंभ केला आहे. त्या जमिनींची प्रत्यक्ष पाहणी करुन सात बाराच्या उताºयावर पीक नोंदणी करावी, आदिवासी मुलांना शिष्यवृत्ती वाढ करावी, तसेच घरकुलांसाठी सरकारची व शेती महामंडळाची जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी ढवळे यांनी केली.मोर्चासमोर अनिल जाधव, पवनराजे सोनवणे, सुभाष मोरे आदिंची भाषणे झाली. यावेळी दिलीप मोरे, उत्तम पवार, शिवाजी मोरे, विशाल बर्डे, भाऊसाहेब सुरसे, संजय माळी, मारुती बर्डे आदी उपस्थित होते.

जातीच्या दाखल्यांअभावी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द

भिल्ल समाजाला जातीचे दाखले देण्याची प्रक्रिया सरकारने यापूर्वी सुलभ केली असली तरी आता काही अधिकाºयांनी मात्र वेगवेगळी परिपत्रके काढली आहेत. त्यातून दाखले देण्यास विलंब चालविला आहे. सेतू कार्यालयाकडून विद्यार्थ्यांची अडवणूक केली जाते. ५० वर्षांचे पुरावे मागितले जातात. शहरातील आदिवासी वस्तीगृहातील १२ विद्यार्थ्यांचे व चार विद्यार्थिनींचे जातीचे दाखले न मिळाल्याने त्यांचे वसतीगृहातील प्रवेश रद्द करण्यात आले. विविध महाविद्यालयातील १७ विद्यार्थ्यांना आदिवासींसाठी असलेली शिष्यवृत्ती मिळाली नाही. अशा प्रकारे शेकडो विद्यार्थी अडचणीत आले आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर