शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

श्रीरामपूर काँग्रेसच्या पदाधिकारी निवडी रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:52 IST

श्रीरामपूर तालुका व शहर काँग्रेस समितीच्या पदाधिकारी निवडी अनेक दिवसांपासून रखडल्या आहेत. त्यामुळे पक्ष कार्र्यकर्त्यांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून येत आहे.

रमेश कोठारी । 

श्रीरामपूर : तालुका व शहर काँग्रेस समितीच्या पदाधिकारी निवडी अनेक दिवसांपासून रखडल्या आहेत. त्यामुळे पक्ष कार्र्यकर्त्यांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून येत आहे. कोरोनाच्या संचारबंदीत शिथिलता आली असल्याने लवकरच निवडी होऊन आपली प्रमुख पदावर वर्णी लागेल अशी अपेक्षा कार्यकर्ते बाळगून  आहेत.

जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी राजीनामा दिला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रभारी जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब साळुंके यांची नियुक्ती केली. तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अरुण नाईक यांची नियुक्ती केली.  शहराध्यक्षपदी नुकतीच संजय छल्लारे यांची नियुक्ती करण्यात आली. 

मात्र विधानसभेच्या निवडणुुका पार पडून सहा महिने उलटून गेले आहेत. तरीही तालुका व शहराची कार्यकारिणी घोषित झालेली नाही. पक्षांतर्गत कार्यक्रम, आंदोलने, मोर्चे आदींना त्यामुळे निमंत्रणे देता येत नाहीत. निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तालुकाध्यक्ष अरुण नाईक यांनीही ते मान्य केले. आमदार लहू कानडे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्याशी चर्चा करुन लवकरच निवडी होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी पक्षाची समिती, पदाधिकारी व कार्यकारिणी अस्तित्वात आलेली नाही. संचारबंदी शिथिल झाल्यामुळे सर्व काही व्यवस्थित पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली. दिवंगत नेते  जयंत ससाणे यांची उणीव पक्षाला प्रकर्षाने जाणवते असे छल्लारे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील काँग्रेसची कार्यकारिणी अद्याप घोषित झालेली नाही. याद्या तयार असून प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनंतर पंधरा दिवसांत त्यांची घोषणा होईल.- बाळासाहेब साळुंके, जिल्हाध्यक्ष 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरcongressकाँग्रेसPoliticsराजकारण