शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

श्रीगोंद्याच्या कोहळ्याने वाढविला आग्य्राच्या पेठ्याचा स्वाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 03:10 IST

शेतकऱ्यांनी फुलविला कष्टातून मळा : सेंद्रिय पद्धतीचा केला वापर

- बाळासाहेब काकडे श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या कोहळ्याने आग्य्राच्या जगप्रसिद्ध पेठा मिठाईचा स्वाद वाढविला आहे. येथील कोहळ्याला तेथील दुकानदार पसंती देऊ लागले आहेत. जंगलेवाडी, लिंपणगावातील शेतकरी याचे उत्पादन घेत आहेत.कोहळा मूळचा जपान, इंडोनेशियातील आहे. पंजाब, पश्चिम बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्रातील काही भागात कोहळ्याची लागवड केली जाते. हे पीक चार महिन्यांमध्ये घेतले जाते. कृषीतज्ज्ञ राहुल पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलठाणवाडी येथील शेतकरी बापूराव आप्पासाहेब धांडे, अनिल रोडे, अनिल जंगले (जंगलेवाडी), नंदकुमार कोकाटे (लिंपणगाव) यांनीही सेंद्रिय पद्धतीने कोहळा फुलविला. येथील कोहळ्याचा गर पेठा मिठाई तयार करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे शेतकºयांना पंधरा रूपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. एक कोहळा दोन ते तीन किलोपर्यंत भरतो. एकरी १० टन माल निघतो. चार महिन्यात दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळते, असे बापूराव धांडे यांनी सांगितले.औषधी गुणधर्म... : कोहळा हा शीत, लघु, स्निग्ध, मधूर, गुणात्मक, बुद्धीवर्धक, वात-पित्तशामक आहे. यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, प्रथिने तंतुमय व पिष्टमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्व विपूल प्रमाणात असते. कोहळा सूप किंवा रस पिल्याने मेंदूचा थकवा जाऊन उत्साह वाढतो.-डॉ. अरुण रोडे, डॉ. अनिल घोडके, श्रीगोंदामानवी आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला फळे, कांदा व इतर शेती करणे आवश्यक झाले आहे. तालुक्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर अशी शेती केल्यास कृषीमालाचा वेगळा ब्रॅण्ड तयार होऊ शकतो. - पद्मनाभ म्हस्के, तालुकाकृषी अधिकारी, श्रीगोंदा