शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

श्रीरामपूर पालिकेतील दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:37 IST

पंधरा दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी कामावर हजर होताच बेशिस्तीला चाप लावला. मुख्याधिकारी ढेरे हे सकाळी कार्यालयीन वेळेत कामावर ...

पंधरा दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी कामावर हजर होताच बेशिस्तीला चाप लावला. मुख्याधिकारी ढेरे हे सकाळी कार्यालयीन वेळेत कामावर आले. त्यावेळी त्यांनी बांधकाम, आरोग्य, पाणी पुरवठा, अतिक्रमण अशा विविध विभागांतील उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांची स्वत: माहिती घेतली. यात तब्बल ३७ जण कार्यालयात वेळेवर आढळून आले नाहीत. त्यानंतर हा प्रकार पाहून मुख्याधिकारी संतप्त झाले.

कर्मचाऱ्यांनी कामावर सकाळी हजर राहावे. तसे आढळून आले नाही तर ती गैरहजेरी धरली जाईल. कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. नागरिकांना अडचण होईल, असे वर्तन कोणीही करू नये, असे मुख्याधिकारी ढेरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

दरम्यान, कामावर परतल्यानंतर सर्व विभागांचा आपण स्वत: आढावा घेत आहोत. पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्याची तातडीने करावयाची कामे पाहत असल्याचे ढेरे यांनी सांगितले. शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या घनकचरा व्यवस्थापनाची निविदा प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. गेल्या पंधरा दिवसांमध्ये हे काम रखडले होते. त्यावर तातडीने कार्यवाही करू, असे मुख्याधिकारी ढेरे म्हणाले.

पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर सर्वसाधारण सभांमधून नगरसेवक अनेकदा नाराजी व्यक्त करतात. मात्र, आता मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई केल्याने बेशिस्तीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.