शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शूरा आम्ही वंदिले : हसत हसत कवटाळले मृत्यूला, शहीद संतोष जगदाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 12:52 IST

कारगील जिल्ह्यातील द्रास हे शहर समुद्रसपाटीपासून १० हजार ८०० फूट उंचीवर वसलेले़ बर्फाळ प्रदेश आणि उंचच उंच पर्वतरांगा.

ठळक मुद्देहवालदार संतोष जगदाळेजन्मतारीख १५ जुलै १९८१सैन्यभरती १२ जानेवारी १९९९वीरगती २ जुलै २०१५वीरपत्नी शीतल संतोष जगदाळे

कारगील जिल्ह्यातील द्रास हे शहर समुद्रसपाटीपासून १० हजार ८०० फूट उंचीवर वसलेले़ बर्फाळ प्रदेश आणि उंचच उंच पर्वतरांगा. या पर्वतरांगामधून वाट काढत सहा भारतीय जवानांचे एक वाहन सैन्याच्या मुख्य तळाकडे जात होते. उंच टेकडीवर लपलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी अचानक या जवानांच्या गाडीवर बॉम्ब वर्षाव सुरु केला. या जवानांमध्ये भोयरे गांगर्डा येथील संतोष जगदाळे यांचाही समावेश होता. अचानक हल्ला होताच भारतीय जवानांनीही वाहनामधून अतिरेक्यांवर फायरिंग केली. मात्र, पाकिस्तानी अतिरेकी उंच डोंगरावर होते व ते अतिशय उंचीवरुन भारतीय जवानांवर लपून हल्ले करीत होते. प्रचंड प्रमाणात सुरु असलेला बॉम्ब वर्षाव आणि धुरांचे लोळ यामुळे भारतीय सैनिक अतिरेक्यांचा प्रतिकार करू शकले नाहीत.शहीद संतोष जगदाळे हे पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील तबाजी व कौशल्या जगदाळे यांचे शूरवीर पुत्र. तबाजी हे सैन्यात होते. त्यामुळे त्यांचे देशपे्रम आणि भूमातेच्या रक्षणाचे धडे लहानपणापासून मिळालेले संतोषदेखील सैन्यात दाखल झाले. आई-वडिलांना एकुलता एक मुलगा. पण ‘देशसेवा फर्स्ट’ म्हणणाऱ्या तबाजी यांनी संतोष यांच्यामध्ये लहानपणापासूनच सैन्याची शिस्त व संस्कार रुजवले होते. संतोष यांचे प्राथमिक शिक्षण भोयरे गांगर्डा येथे, तर रूई छत्रपती येथे माध्यमिक व उर्वरित शिक्षण शिरूरला झाले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सैन्यात भरती होण्यासाठी संतोष यांनी तयारी सुरु केली होती. पुणे, बेळगाव येथे झालेल्या सैनिक भरतीत अपयश आले. पण त्यांनी प्रयत्न सुरुच ठेवले. १९९९ मध्ये कुलाबा (मुंबई) येथे सैन्य भरती झाली. त्यासाठी ते मैदानात उतरले. शारीरिक चाचण्या आणि परीक्षेत टॉप करुन संतोष १२ जानेवारी १९९९ मध्ये देशसेवेसाठी भारतीय सैन्यात दाखल झाले. संतोष देशसेवेत रुजू झाल्याचा आई, वडिलांनाही आनंद झाला.सन २००५ मध्ये पारगाव (ता. दौंड) येथील शीतल यांच्याबरोबर संतोष यांचा विवाह झाला. याच काळात त्यांनी अरूणाचल प्रदेश, इंदोर, जम्मू, हैदराबाद या ठिकाणी सेवा केली. या काळात त्यांना संचिता व प्रथमेश ही मुले झाली. हैदराबाद येथे बदली झाल्यावर त्यांनी पत्नी शीतल, मुलगी संचिता व मुलगा प्रथमेश यांना आपल्याबरोबर लष्करी निवासातच ठेवले होते. मुलांचे शिक्षणही तेथेच असल्याने सर्वच संसार सुरळीत चालला होता.संतोष हे कारगील भागात तीन महिन्यांसाठी गेले होते. २ जुलै २०१५ रोजी सकाळी सात वाजता संतोष यांचा पत्नी शीतल यांना फोन आला, ‘‘माझी तीन महिन्यांची येथील सेवा संपून मी उद्या हैदराबादमध्ये येण्यास निघणार आहे. मात्र त्याच दिवशी दुपारी जवान संतोष जगदाळे यांच्यासह सहा जवान लष्करी वाहनातून कारगीलमधील द्रास भागातून येत असताना उंचच उंच टेकड्यांवरुन पाकिस्तानी अतिरेक्यांनी हातबॉम्बचा वर्षाव केला. अचानक हल्ला होताच भारतीय जवानांच्या वाहन चालकाने वाहनाचा वेग वाढविला. त्याचवेळी भारतीय जवान वाहनामधून अतिरेक्यांवर फायरिंग करु लागले़ मात्र, पाकिस्तानी अतिरेकी उंच डोंगरावर होते व ते अतिशय उंचीवरुन भारतीय जवानांवर लपून हल्ले करीत होते. प्रचंड प्रमाणात सुरु असलेला बॉम्ब वर्षाव आणि धुरांचे लोळ यामुळे भारतीय सैनिक अतिरेक्यांचा प्रतिकार करू शकले नाहीत. यात संतोष यांच्यासह सहा जवान शहीद झाले. ही वार्ता दुस-या दिवशी शीतल यांना कळवण्यात आली. त्यांना धक्काच बसला. त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. पण भारतमातेसाठी माझ्या पतीने लढा दिला याचा अभिमानही त्यांना होता. ५ जुलै रोजी त्यांच्या पार्थिवावर राळेगण थेरपाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.वीरपत्नीवर कुटुंबाची जबाबदारीजवान संतोष जगदाळे हे कारगील युद्धात शहीद झाल्याने कुटुंबाची जबाबदारी पत्नी शीतल यांच्यावर आली. पतीच्या निधनानंतर त्याच युनिटमध्ये नोकरीचा प्रस्ताव शीतल यांच्यासमोर ठेवण्यात आला होता. त्यासाठी शीतल यांनी संगणक शिक्षणही पूर्ण केले. परंतु तिथे संतोष यांच्याशिवाय मन रमेना म्हणून शीतल गावाकडे परतल्या. शिरूर येथे सासू कौशल्या व मीनाबाई, मुलगी संचिता, मुलगा प्रथमेश यांच्यासह शीतल राहत आहेत. सर्व कुटुंबाची जबाबदारी शीतल यांच्यावरच येऊन पडली आहे. महिन्याला मिळणा-या पेन्शनवरच त्यांची गुजराण सुरु असून, मुलांच्या पुढील शिक्षणाची चिंता त्यांना सतावतेय.

राळेगण थेरपाळमध्ये स्मारकशहीद जवान संतोष जगदाळे यांचे मूळ गाव असलेल्या राळेगण थेरपाळ येथे जगदाळे कुटुंब तसेच पारनेर पंचायत समितीमधील बांधकाम अभियंता अजय जगदाळे व अमर जगदाळे यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांना एकत्रित करीत शहीद जवान संतोष जगदाळे यांचे स्मारक उभारले आहे. तेथे नियमित कार्यक्रमही होतात. शहीद जवान संतोष जगदाळे यांच्या स्मृती कायम रहाव्यात, यासाठी ग्रामपंचायतीने विधायक उपक्रम हाती घ्यावा, असे ग्रामस्थांना वाटते.शासनाकडून दखल नाहीमहाराष्ट्र शासनाने नागपूर येथे वीरपत्नी शीतल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव केला. एस.टी.चा मोफत प्रवासाचा पासही मिळाला आहे. पण त्याने मुलांचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. म्हणून शीतल या शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्नशील आहेत. शासकीय जमीन मिळावी, यासाठी त्यांनी प्रस्ताव दाखल केला आहे. पण अद्याप शासनाने दखल घेतली नाही, असे शीतल जगदाळे यांनी सांगितले.शब्दांकन - विनोद गोळे

टॅग्स :AhmednagarअहमदनगरIndependence Dayस्वातंत्र्य दिनLokmatलोकमत