शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

कलावंताचा शोकात्मक जीवनप्रवास

By नवनाथ कराडे | Updated: November 9, 2017 18:32 IST

राज्य नाट्य स्पर्धेच्या दुस-या दिवशी बुधवारी ‘अखेरची रात्र’ हे नाटक सादर झाले. सप्तरंग थिएटर्सने नाटकाची निर्मिती केली आहे. नाटकाचे लेखन लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले असून, प्रा. श्याम शिंदे यांनी दिग्दर्शन केले आहे. तर सहायक दिग्दर्शन अंजना पंडित हिने केले आहे.

ठळक मुद्देअखेरची रात्र : नाट्यसमीक्षण

नवनाथ खराडेअहमदनगर : चित्रपट क्षेत्रात प्रथितयश मिळवलेला गुरू हा एक कलावंत. प्रेरणा नावाची गायिका असलेली त्याची अर्धागिनी. चित्रपटाच्या माध्यमातून गुरूच्या आयुष्यात प्रवेश करणारी अभिनेत्री प्रतिभा. याचमुळे गुरूच्या संसारिक आयुष्यात ठिणगी पडते. गुरू द्विधा मन:स्थितीत अडकतो. गुरू प्रेरणा आणि प्रतिभेपासून दूर राहू शकत नाही, अन् सिनेमापासून तर अजिबातच नाही. मात्र या दोघी गुरूला सोडून निघून गेल्यामुळे गुरूच्या जीवनाचा अंत होतो. अशा प्रकारे एका कलावंताची व्यथा ‘अखेरची रात्र’ या शोकात्मक नाटकातून मांडण्यात आली आहे.राज्य नाट्य स्पर्धेच्या दुस-या दिवशी बुधवारी ‘अखेरची रात्र’ हे नाटक सादर झाले. सप्तरंग थिएटर्सने नाटकाची निर्मिती केली आहे. नाटकाचे लेखन लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले असून, प्रा. श्याम शिंदे यांनी दिग्दर्शन केले आहे. तर सहायक दिग्दर्शन अंजना पंडित हिने केले आहे. गुरू नावाच्या सिनेमाक्षेत्रात यश मिळविलेल्या एका कलावंताचा कलाप्रवास आणि संसारिक प्रवास नाटकातून मांडण्यात आला आहे. कलावंत गुरू दत्तच्या जीवनात गायिका प्रेरणा आणि अभिनेत्री प्रतिभा प्रवेश करतात. प्रेरणा ही लग्नाची बायको असते, तर त्यानंतर प्रतिभाच्या प्रेमात गुरू बुडतो. प्रेरणा प्रतिभास स्वीकारत नाही. समाजमान्यतेसाठी गुरूला लग्न करण्याचा आग्रह प्रतिभा धरते. मात्र गुरू त्यास नकार देतो. या नकारामुळे प्रतिभा गुरूपासून फारकत घेते. त्यानंतर गायिका प्रेरणाही गुरूला सोडून जाते. यातूनच पुढे गुरूच्या जीवनाची ‘अखेरची रात्र’ येते. कलाक्षेत्रात प्रथितयश मिळविलेल्या कलाकाराला समाजामुळे त्याच्या संसारिक जीवनात अपयश आल्याचे ‘अखेरची रात्र’ या नाटकातून दाखविण्यात आले आहे. अब्बास यांच्या लेखणीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळतो. त्यानंतर प्रेरणा आणि प्रतिभा दोघीही अब्बास यांच्या घरी येतात. याच घरी गुरूचा संपूर्ण जीवन प्लॅशबॅकमध्ये उलगडतो.नाटकामध्ये कलावंत गुरूची भूमिका प्रा. रवींद्र काळे यांनी साकारली आहे. गुरूच्या पहिल्या पत्नीची गायिका प्रेरणाची भूमिका अनघा पंडित हिने साकारली आहे. प्रतिभा हिची भूमिका आकांक्षा शिंदे हिने निभावली असून, अब्बासची भूमिका सुनिल तरटे यांनी केली आहे.केंद्रस्थानी असलेल्या गुरूची भूमिका प्रा. काळे यांनी साकारली आहे. किरकोळ अपवाद वगळता भूमिका उत्तम निभावली आहे. अब्बासची भूमिकाही उत्तम झाली आहे. आकांक्षा शिंदे हिनेही पूर्ण ताकद पणाला लावून भूमिका पेलावली आहे, तर अनघा पंडित हिने अप्रतिम काम केले आहे. सादरीकरण उत्तम झाले आहे. पहिल्या अंकातील नाटकाची संथ गती दुसºया अंकातही कायम आहे. संपूर्ण नाटकात लाइटचा वापर उत्तम करण्यात आला आहे. एका ठिकाणी क्षणभर सुरू होऊन विझलेला लाइट चुकी दाखवून जातो. सत्तरच्या दशकातील परिस्थितीवर हे नाटक आधारित आहे. मात्र प्रेक्षकांना सत्तरच्या दशकात दिग्दर्शकाला घेऊन जाण्यात यश आलेले दिसत नाही. अनेक वेळा नाटकातील हिंदी भाषा खटकते. अब्बास हे एकटेच पात्र मुस्लिम असल्याने किंवा नाटक सिनेमा क्षेत्राशी संबंधित असल्याने हिंदी भाषेचा वापर करण्यात आला असावा. मात्र, तीनही शक्यतांचा विचार करता हिंदी भाषेचे उच्चार खटकतात. ही भाषा सिनेमाक्षेत्रातील हिंदी, मुसलमानांची हिंदी किंवा अस्सलिखित हिंदी वाटत नाही. संगीत अलीकडील काळातील वापरल्याने सत्तरचा काळ जाणवत नाही. नेपथ्य, वेषभूषा, रंगभूषा या बाबी चांगल्या झाल्या आहेत.

अखेरची रात्र

निर्मिती : सप्तरंग थिएटर्स अहमदनगरलेखक : लक्ष्मीकांत देशमुखदिग्दर्शक : श्याम शिंदेपात्र : गुरू : प्रा. रवींद्र काळे,अब्बास : सुनील तरटेप्रेरणा : अनघा पंडितप्रतिभा : आकाक्षा शिंदेतंत्रसहाय्यनेपथ्य : हेमंत कुलकर्णी, शंभूराजे घोलपप्रकाशयोजना : बिपीन काजळेसंगीत : रवींद्र वाणी, शुभांगी ओहोळ, शिवम तुपचेवेषभूषा : अंजना पंडित, सोनल काळेरंगभूषा : चंद्रकात सैंदाणे, शिल्पा लोखंडेरंगमंच व्यवस्था : सुधीर देशपांडे, मयूर खोत, दीपक ओहोळ, हेमत लोखंडे, कुंदा शिंदेव्यवस्थापन - शशिकांत मगर

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर