शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

भाजपकडून अवहेलना होऊनही शिवसेना सत्तेतच : बाळासाहेब थोरात यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 21:35 IST

जनतेला भूलथापा देऊन देशात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. गोरगरीब, शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात या सरकारचे धोरण आहे.

संगमनेर : शेतकरी क र्जमाफीनंतर राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मोठ्या जाहिरातबाजीनंतर कोणत्याही शेतक-याला कर्जमाफी मिळाली नाही. सत्ताधारी भाजपकडून सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची अवहेलना सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कायम जनतेच्या बरोबर राहण्याची भूमिका होती. मात्र, अनेकदा अवहेलना होऊनही शिवसेना सत्तेत असल्याची टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, जनतेला भूलथापा देऊन देशात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. गोरगरीब, शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात या सरकारचे धोरण आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कामकाजामुळे राज्यील विकासकामे रखडली आहेत. सरकारच्या मागील ३ वर्षांचे कामकाज बघता जनता त्यांच्या क ामकाजावर असमाधानी आहे. कोणतेही ठोस काम या काळात झाले नाही. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेतक-यांनी शेतात पिकविलेल्या सोयाबीनची खरेदी सरकारने केली नाही. कांदा व तूर या पिकांबाबत हीच परिस्थिती आहे. पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडले असून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे.सरकारची प्रशासनावर कोणतीही पकड नसल्याने मागील ३ वर्षांत शेतकºयांना कृषी पंपाची वीज बिलेही मिळाली नाहीत. पीक पाण्याचे दिवस आले असता कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याने शेतकºयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महानगरांमध्येही भारनियमन होत असून राज्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे.

१८२ उमेदवार निवडण्याची जबाबदारी

देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात निवडणुकीत आपल्याकडे १८२ उमेदवारांची निवड करण्याची जबाबदारी असून गुजरातमध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. भाजपने विकासाचे मॉडेल म्हणून गुजरातला पुढे केले, परंतु जीएसटी, नोटाबंदी, घसरलेला आर्थिक दर यामुळे आर्थिक मंदीसह व्यापार व प्रगती मंदावली आहे. भाजपविषयी जनतेत तीव्र नाराजी आहे. काँग्रेसला या निवडणुकीत नक्कीच मोठे यश मिळणार असल्याचा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

कन्हैय्या कुमार यांना व्यक्त होण्याचा अधिकार

कन्हैय्या कुमार यांना विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत विचार मंथन झालेच पाहिजे परंतु भाजपाकडून सर्वत्र मुस्काटबाजी केली जात असल्याची टिका आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातBJPभाजपाShiv Senaशिवसेना