शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून अवहेलना होऊनही शिवसेना सत्तेतच : बाळासाहेब थोरात यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 21:35 IST

जनतेला भूलथापा देऊन देशात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. गोरगरीब, शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात या सरकारचे धोरण आहे.

संगमनेर : शेतकरी क र्जमाफीनंतर राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मोठ्या जाहिरातबाजीनंतर कोणत्याही शेतक-याला कर्जमाफी मिळाली नाही. सत्ताधारी भाजपकडून सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची अवहेलना सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कायम जनतेच्या बरोबर राहण्याची भूमिका होती. मात्र, अनेकदा अवहेलना होऊनही शिवसेना सत्तेत असल्याची टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, जनतेला भूलथापा देऊन देशात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. गोरगरीब, शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात या सरकारचे धोरण आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कामकाजामुळे राज्यील विकासकामे रखडली आहेत. सरकारच्या मागील ३ वर्षांचे कामकाज बघता जनता त्यांच्या क ामकाजावर असमाधानी आहे. कोणतेही ठोस काम या काळात झाले नाही. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेतक-यांनी शेतात पिकविलेल्या सोयाबीनची खरेदी सरकारने केली नाही. कांदा व तूर या पिकांबाबत हीच परिस्थिती आहे. पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडले असून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे.सरकारची प्रशासनावर कोणतीही पकड नसल्याने मागील ३ वर्षांत शेतकºयांना कृषी पंपाची वीज बिलेही मिळाली नाहीत. पीक पाण्याचे दिवस आले असता कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याने शेतकºयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महानगरांमध्येही भारनियमन होत असून राज्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे.

१८२ उमेदवार निवडण्याची जबाबदारी

देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात निवडणुकीत आपल्याकडे १८२ उमेदवारांची निवड करण्याची जबाबदारी असून गुजरातमध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. भाजपने विकासाचे मॉडेल म्हणून गुजरातला पुढे केले, परंतु जीएसटी, नोटाबंदी, घसरलेला आर्थिक दर यामुळे आर्थिक मंदीसह व्यापार व प्रगती मंदावली आहे. भाजपविषयी जनतेत तीव्र नाराजी आहे. काँग्रेसला या निवडणुकीत नक्कीच मोठे यश मिळणार असल्याचा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

कन्हैय्या कुमार यांना व्यक्त होण्याचा अधिकार

कन्हैय्या कुमार यांना विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत विचार मंथन झालेच पाहिजे परंतु भाजपाकडून सर्वत्र मुस्काटबाजी केली जात असल्याची टिका आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातBJPभाजपाShiv Senaशिवसेना