शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

'शिवसेना आणि ठाकरे वेगळे होऊ शकत नाहीत, जनता काय दुधखुळी नाही'- बाळासाहेब थोरात

By शेखर पानसरे | Updated: February 17, 2023 20:23 IST

'निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून त्यांची पातळी सुद्धा खालावली आहे.'

संगमनेर :शिवसेना आणि ठाकरे हे कधी वेगळे होऊ शकत नाहीत. निवडणूक आयोगाने तो प्रयत्न केला असेल, परंतू महाराष्ट्रातील जनता काय दुधखुळी नाही. जनतेला राजकारण चांगले समजते. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून त्यांची पातळी सुद्धा खालावली आहे. या संस्थेवर राजकारणाचा दबाव असून त्यातूनच हा राजकीय निर्णय आहे. अशी टीका माजी महसूल मंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्यानंतर आमदार थोरात यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जो निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. तो लोकशाहीला घातक असा आहे. शिवसेना ठाकरे यांच्यापासून वेगळी काढूच शकत नाही. ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण आहे. ही संघटना वाढवण्यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य घातले आहे. त्यामूळे जनता जो निर्णय देईल तो उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच निर्णय देईल.

आपल्याला या निवडणुकांमध्येच तो निर्णय नक्की दिसून येईल. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. निरपेक्ष भावनेने निर्णय देणे, कुणा एकाच्या बाजूने निर्णय न देणे, ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु आजच्या निर्णयाने स्वायत्त संस्थेत किती राजकारण झालेले आहे. हे प्रत्यक्ष उदाहरणासह दिसते आहे. देशात चाललेले राजकारण भारतीय जनता खपवून घेणार नाही आणि त्याला उत्तर देईल. निवडणूक आयोगाच्या बाबतीत राजकारण स्पष्ट दिसते आहे. कधी नव्हता एवढा अन्याय ते लोकशाहीवर करत आहेत. सामान्य जनता सुद्धा हे ओळखून आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड निवडणुकीत जनता लोकशाहीच्या बाजूने उभे राहील आणि याचा फायदा महाविकास आघाडीला होईल.

टॅग्स :SangamnerसंगमनेरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे