शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

'शिवसेना आणि ठाकरे वेगळे होऊ शकत नाहीत, जनता काय दुधखुळी नाही'- बाळासाहेब थोरात

By शेखर पानसरे | Updated: February 17, 2023 20:23 IST

'निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून त्यांची पातळी सुद्धा खालावली आहे.'

संगमनेर :शिवसेना आणि ठाकरे हे कधी वेगळे होऊ शकत नाहीत. निवडणूक आयोगाने तो प्रयत्न केला असेल, परंतू महाराष्ट्रातील जनता काय दुधखुळी नाही. जनतेला राजकारण चांगले समजते. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून त्यांची पातळी सुद्धा खालावली आहे. या संस्थेवर राजकारणाचा दबाव असून त्यातूनच हा राजकीय निर्णय आहे. अशी टीका माजी महसूल मंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्यानंतर आमदार थोरात यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जो निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. तो लोकशाहीला घातक असा आहे. शिवसेना ठाकरे यांच्यापासून वेगळी काढूच शकत नाही. ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण आहे. ही संघटना वाढवण्यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य घातले आहे. त्यामूळे जनता जो निर्णय देईल तो उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच निर्णय देईल.

आपल्याला या निवडणुकांमध्येच तो निर्णय नक्की दिसून येईल. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. निरपेक्ष भावनेने निर्णय देणे, कुणा एकाच्या बाजूने निर्णय न देणे, ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु आजच्या निर्णयाने स्वायत्त संस्थेत किती राजकारण झालेले आहे. हे प्रत्यक्ष उदाहरणासह दिसते आहे. देशात चाललेले राजकारण भारतीय जनता खपवून घेणार नाही आणि त्याला उत्तर देईल. निवडणूक आयोगाच्या बाबतीत राजकारण स्पष्ट दिसते आहे. कधी नव्हता एवढा अन्याय ते लोकशाहीवर करत आहेत. सामान्य जनता सुद्धा हे ओळखून आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड निवडणुकीत जनता लोकशाहीच्या बाजूने उभे राहील आणि याचा फायदा महाविकास आघाडीला होईल.

टॅग्स :SangamnerसंगमनेरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे