शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

शिर्डी मतदारसंघ पाणीदार करणार : सदाशिव लोखंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 16:49 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने समन्यायी पाणी वाटप कायदा केला.

शिवाजी पवारश्रीरामपूर : काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने समन्यायी पाणी वाटप कायदा केला. त्यांच्याच पापामुळे मराठवाड्याला पाणी देण्याची वेळ आली आहे. घाटमाथ्यावरून समुद्राला वाहून जाणारे ६० टीएमसी पाणी प्रवरा व गोदावरी खोऱ्यात वळवून येथील पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पुढील पाच वर्षात प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुक्रवारी येथे झालेल्या सभेसाठी आले असता लोखंडे यांच्याशी ‘लोकमत’ ने संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे, अशोक थोरे हे उपस्थित होते. लोखंडे यांनी अनेक मुद्यांवर दिलखुलास संवाद साधला. विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. लोखंडे म्हणाले, आघाडी सरकारने जरी निळवंडे धरण पूर्णत्वाला नेले असले तरी तेवढे पुरेसे नाही. जोपर्यंत शेतात पाणी पोहोचत नाही, तोपर्यंत त्या कामाला काहीही अर्थ नाही. आपण केंद्र सरकारकडून धरणाला मंजुरी मिळवून देत कालव्याच्या कामांना चालना दिली. मतदारसंघातील पूर्वेकडील श्रीरामपूर, नेवासे, राहुरीच्या काही भागाच्या पाण्याचाही आपण विचार केला आहे. घाटमाथ्यावरचे पाणी वळविण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकारात्मक आहेत. हा प्रकल्प झाल्यास नगरसह मराठवाड्याचाही पाणी प्रश्न सुटणार आहे. मतदारसंघात आपण कृषी उत्पादक कंपन्या सुरू केल्या. त्यामुळे शेती उद्योगाला चांगले दिवस येतील. देशात शिर्डीसाठी या कंपन्या मंजूर करून आणल्या. ही संधी फार थोड्या खासदारांना मिळाली, असे लोखंडे म्हणाले.प्रत्येक तालुक्यात विकासाचा समतोल साधलाश्रीरामपुरच्या टपाल कार्यालयात नुकतेच पासपोर्ट कार्यालय सुरू केले. त्यामुळे येथील तरूणांना परदेशात जाता येणार आहे. देशात फार मोजक्याच ठिकाणी ही मंजुरी मिळाली आहे.विकास करताना मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याच्या विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे. पुढील पाच वर्षासाठी माझ्या चांगल्या योजना आहेत, असे ते म्हणाले.विरोधी उमेदवाराचा प्रशासनावर वचक नाही. त्यांच्याकडून कामे होत नाहीत. हे सर्व जनतेला माहीत आहे. माझ्याकडे कामाचा चांगला अनुभव आहे, असे लोखंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019