शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

शेवगाव पंचायत समिती हंडा मोर्चाने दणाणली, महिला आक्रमक, अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 17:55 IST

तालुक्यातील मौजे आखेगाव येथील काटेवाडी वस्तीवर गेल्या दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने त्रस्त असलेल्या महिलांनी शुक्रवारी हंडा मोर्चा नेऊन शेवगाव पंचायत समिती दणाणून सोडली.

शेवगाव : तालुक्यातील मौजे आखेगाव येथील काटेवाडी वस्तीवर गेल्या दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने त्रस्त असलेल्या महिलांनी शुक्रवारी हंडा मोर्चा नेऊन शेवगाव पंचायत समिती दणाणून सोडली.काटेवाडी वस्तीवरील नंदीवाले तिरमल समाजाच्या महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर पायपीट करावी लागते. गावाला वस्तीजवळून पिण्याचा पाण्याचा पुरवठा होतो. मात्र वस्तीवर जाणीवपूर्वक पाणी पुरवठा होत नसल्याने वस्तीवरील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो. वस्तीवरील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी भारतीय टायगर फोर्सचे राज्य प्रवक्ते प्रा.किसान चव्हाण, रावसाहेब जाधव, बाळासाहेब आव्हाड, प्रकाश वाघमारे, लक्ष्मण मोरे, बाबासाहेब फुलमाळी, गंगा फुलमाळी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पंचायत समितीत महिलांचा हंडामोर्चा नेण्यात आला. यात डोक्यावर रिकामे हंडे घेऊन वस्तीवरील महिला सहभागी झाल्या होत्या. वस्तीवरील संतप्त नागरिकांनी गटविकास अधिकारी अशोक भवारी यांना काही वेळ घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली.मोर्चेकºयांच्या घोषणांनी शेवगावचे प्रमुख रस्ते व पंचायत समिती परिसर दणाणून गेला. गटविकास अधिकाºयांच्या दालनात जाऊन पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे संबंधिताचे दुर्लक्ष असून आम्ही या आंदोलनाबाबत पाच दिवसांपूर्वी निवेदन दिले. आमच्या निवेदनाची दखल घेणे तर दूर, उलट ग्रामसेवकांनी वस्तीवर येऊन निवेदन कोणी दिले याचा जाब विचारल्याची तक्रार आंदोलकांनी केली. गोविंदा फुलमाळी, अनिता फुलमाळी, सुमन फुलमाळी, सोनाली फुलमाळी, रावसाहेब फुलमाळी, बाळू फुलमाळी, साहेबा फुलमाळी, बाबू फुलमाळी, सुरेखा फुलमाळी, राणी फुलमाळी, उत्तम फुलमाळी, हनुमंता फुलमाळी, प्रतीक्षा फुलमाळी, मालनबाई फुलमाळी, जनाबाई फुलमाळी आदींसह वस्तीवरील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.टाकी असूनही वस्ती पाण्यावाचून कोरडीआमच्या वस्तीवर पाण्याची टाकी आहे. आमच्या वस्तीपासून गावात जाणाºया पाईपलाईन मधून चार ते पाच दिवसांनी पाणी जाते. मात्र आमच्या वस्तीवर मुद्दाम पाणी सोडले जात नाही. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नी ग्रामसेवक निष्काळजीपणा करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मोर्चेकºयांनी केली. यावेळी गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी रविवारी वस्तीवर येऊन पाणी प्रश्नाबाबत निर्णायक तोडगा काढण्यात येईल. यापुढे पिण्याच्या पाण्याबाबत वस्तीवर अन्याय होणार नाही, प्रसंगी कुचराई करणाºयांवर कारवाई करण्यात येईल, असे गटविकास अधिका-यांनी जाहीर केल्यानंतर पुकारण्यात आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव