शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

पाटपाण्यासाठी शेवगाव-पैठण राज्यमार्ग रोखला : पाडळीत दीड तास रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 17:36 IST

पाण्याअभावी जळून चाललेल्या खरीप हंगामातील पिकांसह उसाला पाटपाणी मिळावे. मुळा पाटचारीचे आवर्तन सुटून चार दिवस झाले तरी गाव परिसराला पाणी न मिळाल्याने मंगळवारी संतप्त शेतकऱ्यांनी तिसगावजवळील शेवगाव-पैठण राज्यमार्गावरील पाडळी ते दीड तास रास्तारोको आंदोलन केले.

तिसगाव : पाण्याअभावी जळून चाललेल्या खरीप हंगामातील पिकांसह उसाला पाटपाणी मिळावे. मुळा पाटचारीचे आवर्तन सुटून चार दिवस झाले तरी गाव परिसराला पाणी न मिळाल्याने मंगळवारी संतप्त शेतकऱ्यांनी तिसगावजवळील शेवगाव-पैठण राज्यमार्गावरील पाडळी ते दीड तास रास्तारोको आंदोलन केले.पाडळी, चितळी, साकेगाव या तीन गावचे लाभार्थी शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. ज्येष्ठ नेते शेषराव कचरे, युवा नेते बाजीराव गर्जे, सिकंदर शेख, दिलीप कचरे आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. पाण्याअभावी भुईमुग, तूर, मूग पिके जळून गेली आहेत. पाटपाणी मिळाल्यास बाजरी, कडवळ, मका अशी पिके काहीअंशी तरी जगण्याची शक्यता आहे. पाण्याअभावी वाळून चाललेल्या उसाच्या पिकाला दिलासा मिळेल. सकाळी नऊ वाजताच आंदोलन सुरू झाले होते. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त प्रवास करणारे व शाळकरी विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याने काही काळ वाहन कोंडीचे प्रकार झाले. युवा शेतकरी गणेश कचरे, सजन गर्जे, शंकर भिसे, सुधाकर डांगे, भगवान गर्जे आदींनी याप्रसंगी पोटतिडकीने भावना मांडल्या. पाऊस लांबत चालल्याने परिसरातील बळीराजा हवालदिल झाल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर व सहकाºयांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.शुक्रवारी आवर्तन सोडण्याचे आश्वासनपाटपाण्याचे आवर्तन सुटून चार दिवस झाल तरी परिसराला पाणी का मिळत नाही?, असा संतप्त सवाल उपस्थित शेतक-यांनी केला. त्यामुळे पाटबंधारे व महसूल प्रशासनाच्या अधिका-यांना निरूत्तर व्हावे लागले. येत्या शुक्रवारी तीन दिवसांनी पाटपाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार नामदेव पाटील, पाटबंधारे अधिकारी एस. आर. गुंजाळ यांनी संबंधित अधिका-यांशी चर्चा करून दिले. त्यानंतर आंदोलक शेतकरी रस्त्यावरून उठले. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव