शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

शेतक-यांना गाळ तर ठेकेदाराला वाळू : राज्यातील पाच धरणातील गाळ काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:29 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उठताच राज्यातील पाच धरणातील गाळ काढण्याला प्रायोगिक तत्वावर सुरूवात होणार आहे़

भाऊसाहेब येवलेराहुरी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उठताच राज्यातील पाच धरणातील गाळ काढण्याला प्रायोगिक तत्वावर सुरूवात होणार आहे़ आधुनिक यांत्रिक बोटीने दहा वर्षात गाळ काढण्यात येणार आहे़ धरणामधून निघालेला गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणार आहे. मिळालेल्या वाळूवर जलसंपदा विभागाला रॉयल्टी मिळणार आहे़ ई-टेंडर उघडल्यानंतर गाळ काढण्याला मुहूर्त मिळणार आहे़२००९ मध्ये राज्यातील पाच धरणाची गाळ काढण्यासाठी निवड करण्यात आली होती़ महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने यासंदर्भात सर्व्हे केला होता़ त्यामध्ये मुळा, उजनी, जायकवाडी, गोसी खुर्द, गिरणा या धरणांचा समावेश होता़ या धरणातील गाळ काढण्याची मोहीम फत्ते झाल्यानंतर अन्य धरणातील गाळ काढण्यावर निर्णय घेण्यात येणार आहे़जलसंपदा विभागाने ई-निविदा काढली आहे़ गाळ काढण्यासंदर्भात ठेकेदारांनी निविदा पाठविल्या आहेत़ लोकसभेच्या निवडणुकीमुळे निविदा पडून आहेत़ आचारसंहिता संपल्यानंतर पाचही धरणातील गाळ यांत्रिक बोटीच्या सहाय्याने काढण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे़ धरण प्रकल्प उभे राहिल्यानंतर धरणामध्ये अनेक वर्षापासून गाळ साचलेला आहे़ अशा स्वरूपाचा गाळ पहिल्यांदाच काढला जाणार आहे़धरणातून यांत्रिक बोटीव्दारे काढलेला गाळ शेतजमिनीला उपयुक्त ठरणार आहे़ शेतकरी उपलब्ध झालेला गाळ मोफत घेऊन जाऊ शकणार आहेत. गाळामधून वेगळी निघालेली वाळू ठेकेदाराला मिळणार आहे़ वाळूवर ठेकेदाराला रॉयल्टी भरावी लागणार आहे़ सदरहू रॉयल्टी जलसंपदा विभागाला मिळणार आहे़ जास्तीची बोली लावणाºया ठेकेदाराला गाळ काढण्याचे काम देण्यात येणार आहे़मुळाचा एक टीएमसी पाणीसाठा वाढणारमुळा धरणात १९७२ पासून पाणी साठविण्यास सुरूवात झाल्यानंतर ४६ घनमीटर गाळ साचला आहे. तो काढल्यानंतर १ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठा पुनर्रस्थापित होण्यास मदत होणार आहे़सध्या राज्यातील सर्व धरणाच्या पाणी साठ्याने सध्या तळ गाठलेला आहे़महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने मुळा धरणातील गाळाचा सर्व्हे केला आहे़ मुळाचा गाळ काढण्याचे काम दहा वर्ष चालणार आहे़ ई-निविदा प्राप्त झालेल्या आहेत़ आचारसंहिता उठल्यानंतर गाळ काढण्याचे काम सुरू होणार आहे़ त्यामुळे पाण्याचा साठा पुनर्रस्थापित होण्यास मदत होणार आहे़ - रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, अहमदनगर.