शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना गाळ तर ठेकेदाराला वाळू : राज्यातील पाच धरणातील गाळ काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:29 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उठताच राज्यातील पाच धरणातील गाळ काढण्याला प्रायोगिक तत्वावर सुरूवात होणार आहे़

भाऊसाहेब येवलेराहुरी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उठताच राज्यातील पाच धरणातील गाळ काढण्याला प्रायोगिक तत्वावर सुरूवात होणार आहे़ आधुनिक यांत्रिक बोटीने दहा वर्षात गाळ काढण्यात येणार आहे़ धरणामधून निघालेला गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणार आहे. मिळालेल्या वाळूवर जलसंपदा विभागाला रॉयल्टी मिळणार आहे़ ई-टेंडर उघडल्यानंतर गाळ काढण्याला मुहूर्त मिळणार आहे़२००९ मध्ये राज्यातील पाच धरणाची गाळ काढण्यासाठी निवड करण्यात आली होती़ महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने यासंदर्भात सर्व्हे केला होता़ त्यामध्ये मुळा, उजनी, जायकवाडी, गोसी खुर्द, गिरणा या धरणांचा समावेश होता़ या धरणातील गाळ काढण्याची मोहीम फत्ते झाल्यानंतर अन्य धरणातील गाळ काढण्यावर निर्णय घेण्यात येणार आहे़जलसंपदा विभागाने ई-निविदा काढली आहे़ गाळ काढण्यासंदर्भात ठेकेदारांनी निविदा पाठविल्या आहेत़ लोकसभेच्या निवडणुकीमुळे निविदा पडून आहेत़ आचारसंहिता संपल्यानंतर पाचही धरणातील गाळ यांत्रिक बोटीच्या सहाय्याने काढण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे़ धरण प्रकल्प उभे राहिल्यानंतर धरणामध्ये अनेक वर्षापासून गाळ साचलेला आहे़ अशा स्वरूपाचा गाळ पहिल्यांदाच काढला जाणार आहे़धरणातून यांत्रिक बोटीव्दारे काढलेला गाळ शेतजमिनीला उपयुक्त ठरणार आहे़ शेतकरी उपलब्ध झालेला गाळ मोफत घेऊन जाऊ शकणार आहेत. गाळामधून वेगळी निघालेली वाळू ठेकेदाराला मिळणार आहे़ वाळूवर ठेकेदाराला रॉयल्टी भरावी लागणार आहे़ सदरहू रॉयल्टी जलसंपदा विभागाला मिळणार आहे़ जास्तीची बोली लावणाºया ठेकेदाराला गाळ काढण्याचे काम देण्यात येणार आहे़मुळाचा एक टीएमसी पाणीसाठा वाढणारमुळा धरणात १९७२ पासून पाणी साठविण्यास सुरूवात झाल्यानंतर ४६ घनमीटर गाळ साचला आहे. तो काढल्यानंतर १ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठा पुनर्रस्थापित होण्यास मदत होणार आहे़सध्या राज्यातील सर्व धरणाच्या पाणी साठ्याने सध्या तळ गाठलेला आहे़महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने मुळा धरणातील गाळाचा सर्व्हे केला आहे़ मुळाचा गाळ काढण्याचे काम दहा वर्ष चालणार आहे़ ई-निविदा प्राप्त झालेल्या आहेत़ आचारसंहिता उठल्यानंतर गाळ काढण्याचे काम सुरू होणार आहे़ त्यामुळे पाण्याचा साठा पुनर्रस्थापित होण्यास मदत होणार आहे़ - रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, अहमदनगर.