शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

‘तिने’ संघर्ष केला अन् अकाली हातात पडणारी लग्नाची बेडी सैल झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:24 IST

अहमदनगर : माता-पित्यांनी लग्न ठरविल्यानंतर अनेक मुली इच्छा नसताना ही स्वप्नांना मुरड घालून निमुटपणे बोहल्यावर चढतात. नगरमधील एक मुलगी ...

अहमदनगर : माता-पित्यांनी लग्न ठरविल्यानंतर अनेक मुली इच्छा नसताना ही स्वप्नांना मुरड घालून निमुटपणे बोहल्यावर चढतात. नगरमधील एक मुलगी मात्र याला अपवाद ठरली आहे. इच्छेविरोधात ठरलेल्या लग्नाला तिने ठामपणे विरोध करत थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर भरोसा सेलमधील अधिकाऱ्यांनी त्या मुलीच्या नातेवाईकांचे मनपरिवर्तन केले अन् दोन दिवसांवर येऊन ठेपलेले लग्न अखेर सर्वांच्या संमतीने रद्द झाले. अकाली हातात पडणारी लग्नाची बेडी सैल झाल्याने त्या मुलीला आश्रू अनावर झाले.

नगर शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील १९ वर्षीय मुलगी पदवीच्या पहिल्या वर्षांत शिक्षण घेत आहे. शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभा राहायचे आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे अशी तिची जिद्ध आहे. आई-वडिलांनी मात्र काही दिवसांपूर्वी तिचे अचानक लग्न ठरविले. मुलीने या लग्नाला विरोध केला. कुटुंबीय मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. २९ जुलै रोजी साखरपुडा आणि दुसऱ्या दिवशी लग्न अशी तारीख निश्चित झाली. मुलीची घालमेल मात्र वाढत होती. आई-वडील ऐकत नसल्याने तिने २७ जुलै रोजी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे तक्रार केली. अधीक्षक पाटील यांनी हा अर्ज भरोसा सेलकडे पाठवून तत्काळ कार्यवाही करण्याचा आदेश दिले. भरोसा सेलच्या उपनिरीक्षक पल्लवी उंबरहंडे यांनी त्या मुलीच्या माता-पित्यांना तत्काळ नोटीस काढून कार्यालयात आणले. उंबरहंडे यांनी मुलीच्या आई-वडील व इतर नातेवाईकांना समजावून सांगितले. ते मात्र हट्टालाच पेटलेले होते. शेवटी त्यांचे मनपरिवर्तन करण्यात यश आले आणि दोन दिवसांवर आलेले लग्न थांबले. उपनिरीक्षक उंबरहंडे यांच्यासह उपनिरीक्षक अरविंद माने, गावित, सहायक फौजदार राजेंद्र वाघ, कॉन्स्टेबल योगिता साळवे, अनिता विधाते, लाटे, कोळेकर यांच्या पथकाने ही कार्यवाही पूर्ण केली.

--------------

रात्री नऊपर्यंत सुरू होते नातेवाईकांचे समुपदेशन

दोन दिवसांवर आलेल्या लग्नाची घरात जोरदार तयारी सुरू होती. नातेवाईक लग्नासाठी घरी आलेले होते. अशा परिस्थितीत फक्त मुलीचा विरोध आहे म्हणून लग्न थांबविणे शक्य नाही. असा पवित्रा त्या मुलीचे आई-वडील आणि नातेवाईकांनी घेतला. भरोसा सेलच्या प्रमुख पल्लवी उंबरहंडे यांनी मात्र शांततेने त्या मुलीचे आई-वडील आणि इतर नातेवाईकांना समजावून सांगितले. मुलीच्या इच्छेविरोधात तिचे लग्न लावून दिले तर तिचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, ती आयुष्यात सुखी होणार नाही. अशा पद्धतीने रात्री नऊपर्यंत समजूत घातली. त्यानंतर लग्न थांबविण्यात आले.

----------------------

एका कुटुंबातील दोन दिवसांवर येऊन ठेपलेले लग्न थांबविणे मोठे आव्हानात्मक काम होते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मुलीच्या तक्रारीची तत्काळ दखल घेण्यात आली. प्रयत्नाअंती मुलीच्या नातेवाईकांचे परिवर्तन करण्यात आम्हाला यश आले. तसेच प्रत्येक मुलीला स्वत:च्या मर्जीप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. या अधिकारावर कुणीही अतिक्रमण करू शकत नाही. अशी परिस्थिती ओढावलेल्या महिलांना भरोसा सेलच्या माध्यमातून सर्वोतपरी मदत केली जाते.

- पल्लवी उंबरहंडे, उपनिरीक्षक भरोसा सेल, अहमदनगर