शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

‘तिने’ संघर्ष केला अन् अकाली हातात पडणारी लग्नाची बेडी सैल झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:24 IST

अहमदनगर : माता-पित्यांनी लग्न ठरविल्यानंतर अनेक मुली इच्छा नसताना ही स्वप्नांना मुरड घालून निमुटपणे बोहल्यावर चढतात. नगरमधील एक मुलगी ...

अहमदनगर : माता-पित्यांनी लग्न ठरविल्यानंतर अनेक मुली इच्छा नसताना ही स्वप्नांना मुरड घालून निमुटपणे बोहल्यावर चढतात. नगरमधील एक मुलगी मात्र याला अपवाद ठरली आहे. इच्छेविरोधात ठरलेल्या लग्नाला तिने ठामपणे विरोध करत थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर भरोसा सेलमधील अधिकाऱ्यांनी त्या मुलीच्या नातेवाईकांचे मनपरिवर्तन केले अन् दोन दिवसांवर येऊन ठेपलेले लग्न अखेर सर्वांच्या संमतीने रद्द झाले. अकाली हातात पडणारी लग्नाची बेडी सैल झाल्याने त्या मुलीला आश्रू अनावर झाले.

नगर शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील १९ वर्षीय मुलगी पदवीच्या पहिल्या वर्षांत शिक्षण घेत आहे. शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभा राहायचे आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे अशी तिची जिद्ध आहे. आई-वडिलांनी मात्र काही दिवसांपूर्वी तिचे अचानक लग्न ठरविले. मुलीने या लग्नाला विरोध केला. कुटुंबीय मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. २९ जुलै रोजी साखरपुडा आणि दुसऱ्या दिवशी लग्न अशी तारीख निश्चित झाली. मुलीची घालमेल मात्र वाढत होती. आई-वडील ऐकत नसल्याने तिने २७ जुलै रोजी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे तक्रार केली. अधीक्षक पाटील यांनी हा अर्ज भरोसा सेलकडे पाठवून तत्काळ कार्यवाही करण्याचा आदेश दिले. भरोसा सेलच्या उपनिरीक्षक पल्लवी उंबरहंडे यांनी त्या मुलीच्या माता-पित्यांना तत्काळ नोटीस काढून कार्यालयात आणले. उंबरहंडे यांनी मुलीच्या आई-वडील व इतर नातेवाईकांना समजावून सांगितले. ते मात्र हट्टालाच पेटलेले होते. शेवटी त्यांचे मनपरिवर्तन करण्यात यश आले आणि दोन दिवसांवर आलेले लग्न थांबले. उपनिरीक्षक उंबरहंडे यांच्यासह उपनिरीक्षक अरविंद माने, गावित, सहायक फौजदार राजेंद्र वाघ, कॉन्स्टेबल योगिता साळवे, अनिता विधाते, लाटे, कोळेकर यांच्या पथकाने ही कार्यवाही पूर्ण केली.

--------------

रात्री नऊपर्यंत सुरू होते नातेवाईकांचे समुपदेशन

दोन दिवसांवर आलेल्या लग्नाची घरात जोरदार तयारी सुरू होती. नातेवाईक लग्नासाठी घरी आलेले होते. अशा परिस्थितीत फक्त मुलीचा विरोध आहे म्हणून लग्न थांबविणे शक्य नाही. असा पवित्रा त्या मुलीचे आई-वडील आणि नातेवाईकांनी घेतला. भरोसा सेलच्या प्रमुख पल्लवी उंबरहंडे यांनी मात्र शांततेने त्या मुलीचे आई-वडील आणि इतर नातेवाईकांना समजावून सांगितले. मुलीच्या इच्छेविरोधात तिचे लग्न लावून दिले तर तिचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, ती आयुष्यात सुखी होणार नाही. अशा पद्धतीने रात्री नऊपर्यंत समजूत घातली. त्यानंतर लग्न थांबविण्यात आले.

----------------------

एका कुटुंबातील दोन दिवसांवर येऊन ठेपलेले लग्न थांबविणे मोठे आव्हानात्मक काम होते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मुलीच्या तक्रारीची तत्काळ दखल घेण्यात आली. प्रयत्नाअंती मुलीच्या नातेवाईकांचे परिवर्तन करण्यात आम्हाला यश आले. तसेच प्रत्येक मुलीला स्वत:च्या मर्जीप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. या अधिकारावर कुणीही अतिक्रमण करू शकत नाही. अशी परिस्थिती ओढावलेल्या महिलांना भरोसा सेलच्या माध्यमातून सर्वोतपरी मदत केली जाते.

- पल्लवी उंबरहंडे, उपनिरीक्षक भरोसा सेल, अहमदनगर