शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

ती लढली, जिंकली आणि मुलींना उच्चपदी बसवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:21 IST

महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ प्रथम तिला वंदन करते आहे. खरं तर महिला दिन ८ मार्च रोजी असतो. ...

महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ

प्रथम तिला वंदन करते आहे. खरं तर महिला दिन ८ मार्च रोजी असतो. परंतु तिचे दररोज गुणगाण गावे अशी माझी आई. शहरापासून जवळच राहणारी. पाच भावंडे आणि दोन बहिणी असा परिवार. परिवारात सर्वांची ती लाडकी. तिला सर्वजण अक्का म्हणत. ती माझी लाडकी आई. लंकाबाई धिवर.

पूर्वी वयात आल्यानंतर मुलीचे लग्न केले जायचे. ती १६ वर्षांची असतानाच तिचे लग्न झाले. सर्व बहीण-भाऊ, आई-वडिलांची लाडकी, गुणी धैर्यवान कन्या लग्न होऊन उंबरठा ओलांडून सासरी आली. कसे बसे एक वर्ष निघून गेले आणि माझ्या वडिलांच्या थोरल्या बंधूंना देवाज्ञा झाली. या घटनेचा वडिलांना मानसिक धक्का बसला. ते मानसिक रुग्ण झाले. घरावर मोठे संकट आले होते. आई त्यांची सेवा-शुश्रूशा करू लागली. त्यामुळे त्यांच्यात सुधारणा होऊ लागली. पुढे आम्हा तीन मुलींचा जन्म झाला. तिने मुलाची अपेक्षाही केली नाही. माझ्या मुलीच मला मुलासमान अशी तिची धारणा. मुलगा नसल्याची तिने कधीही खंत केली नाही. पती व आम्हा तीन मुलींचा सांभाळ आईने मोठ्या जिद्दीने केला. त्याचवेळी आमच्या मामा-मावशी यांनीही मोलाची साथ दिली. मुलींना शिक्षित बनवून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचा निश्चय तिने केला. त्यासाठी तिने काम शोधायला सुरुवात केली. नोकरीसाठी खूप वनवन हिंडावे लागले. लग्न लवकर झाल्यामुळे व शिक्षण कमी असल्यामुळे नोकरी मिळणेही अवघड झाले होते. पण तिने हिंमत हारली नाही. तिने प्रयत्न सोडले नाहीत. तिच्या प्रयत्नांपुढे सर्व संकटे, अडथळे निखळून पडले अन् तिला समाजकल्याण विभागाच्या शासकीय मुलांचे वसतिगृह या ठिकाणी नोकरी मिळाली. नोकरीसाठी निवड तर झाली होती. नोकरीही चांगली होती. परंतु तीन मुली, त्याही लहान. त्यांना घेऊन परगावी राहायचे मोठे कठीण होते. यापूर्वी कधीही बाहेरगावी जाण्याचा प्रसंग आला नव्हता. आता तिला मुली घेऊन बाहेरगावी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन रहावे लागणार होते. माझे मोठे मामा आणि काका यांनी आईला खूप सहकार्य केले. परगावी राहण्यासाठी आईने हिंमत बांधली. अवघ्या २५ व्या वर्षी आई आम्हा तीन मुलींना घेऊन शासकीय वसतिगृहात स्वयंपाकीण (कूक) म्हणून नोकरीत रुजू झाली. त्यावेळी स्वयंपाकगृहात स्टोव्ह किंवा गॅसचे साधन नव्हते. चुलीवरच सर्व स्वयंपाक असायचा. पावसाळ्यात सरपण ओले असले की चुलीच्या धुरामुळे अक्षरश: तिचे डोळे रक्त ओकायचे. अशा अवस्थेत तिला दिवसभरात ४०० ते ५०० पोळ्या लाटाव्या लागत. संध्याकाळ झाली की आपली पिलं आपली वाट पाहत असतील, त्यांनाही भूक लागली असेल या काळजीने ती घराकडे निघायची. रात्रं-रात्रं जागून घर काम करून मुलींचा अभ्यास घ्यायची. मुलींना तिने कधीही वडिलांची उणीव भासू दिली नाही. मुली १० वी व १२ वीच्या परीक्षेला निघाल्या तरी आई कामावर असायची. तरीही तिचे सर्व लक्ष मुलींकडे असायचे. मुलींना पेपर कसा जाईल, या विचारात ती असायची. मुलींसाठी तिने स्वत:च्या भावना जाळून टाकल्या. ज्या वयात सजून-धजून मिरवायचे दिवस होते, त्या वयात तिला अग्निच्या धगधगत्या वणव्याजवळ बसून चटके सहन करावे लागले. काबाडकष्ट करावे लागले. परंतु तीने न डगमगता मुलींना उच्चशिक्षित केले. आज तिच्या तीनही मुली उच्च पदावर पोहोचलेल्या आहेत. म्हणूनच सलाम माझ्या मातेच्या धैर्याला आणि कष्टाला.

आई ही शिक्षित असो किंवा अशिक्षित, जेव्हा तुम्ही जीवनात अपयशी होता तेव्हा तिच्यासारखा मार्गदर्शक या पृथ्वीवर दुसरा शोधूनही सापडणार नाही.

- मनिषा भिंगारदिवे

०६ लंकाबाई धिवर