शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

पाणीप्रश्न आपण सोडवू-शरद पवार; आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कोपरगावात सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 12:56 IST

कोपरगावची पाण्याची समस्या फार मोठी आहे. शासनाने याकडे कायम दुर्लक्ष केले. मात्र तुमचा पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर मी स्वत: यात लक्ष घालून मदत करील. त्यासाठी  तुम्ही सर्वप्रथम कोपरगावात परिवर्तन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

कोपरगाव : कोपरगावची पाण्याची समस्या फार मोठी आहे. शासनाने याकडे कायम दुर्लक्ष केले. मात्र तुमचा पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर मी स्वत: यात लक्ष घालून मदत करील. त्यासाठी  तुम्ही सर्वप्रथम कोपरगावात परिवर्तन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.सोमवारी कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. सभेचे अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते. व्यासपीठावर उमेदवार आशुतोष काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, संजीव भोर, चैताली काळे, स्नेहल शिंदे, स्वप्नजा वाबळे, पदमकांत कुदळे, डॉ.अजय गर्जे, माजी नगराध्यक्ष  मंगेश पाटील, सुनील गंगूले, सलीम पठाण, मेहमूद सैय्यद, रमेश गवळी, सुनील बोरा, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संभाजी काळे, माधव खिलारी, अशोक खांबेकर उपस्थित होते. कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, अजय गर्जे, संतोष डागा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवार म्हणाले, आशुतोषची निवडणूक पाहिली तेव्हा मला माझी निवडणूक आठवली. आशुतोष आमदार व्हावा, ह्या इच्छेपेक्षा महाराष्ट्रात भविष्यात तयार होणारी तरुण कर्तबगार पिढीमध्ये सर्वात वरच्या स्थानावर आशुतोष असावा. ७१  हजार कोटी रुपये शेतकºयांना कर्जमाफी देण्याचे काम आम्ही केले आणि सर्व शेतकºयांचा उतारा कोरा केला. शेतकºयांना कर्ज दिले, वेळेत कर्ज फेडणाºयांना शून्य टक्के  व्याजदर ठेवला होता. एकावर्षात कर्जमाफी करणारे त्यांना सत्ता देऊन पाच वर्षे झाले मात्र आजपर्यंत पूर्ण कर्जमाफी दिली नाही.  औद्योगिक वसाहती काढून शेतकºयांच्या मुलांना नोकºया उपलब्ध करून दिल्या तसेच सहकार जिवंत ठेवल्याचेही पवार म्हणाले.आशुतोष काळे म्हणाले,  शेतकरी संप मोडीत काढला. आमदार निष्क्रिय आहेत. नगर जिल्ह्यात कर्जत जामखेडसह कोपरगाव निवडून देणार आहे. लाटेवर येणाºया लोकप्रतिनिधी आहे. आमदारकी माझी हौस नाही, जे काही करायचे आहे ते सर्वसामान्य लोकांसाठी करायचं आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019