शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गौरवासाठी तरतूद करणार : शालिनी विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 12:58 IST

जिल्हा परिषदेच्या यशात गुणवंत अधिकारी, कर्मचाºयांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे त्यांचा आदर्श पुरस्काराने उचित सन्मान होणे आवश्यकच आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या यशात गुणवंत अधिकारी, कर्मचाºयांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे त्यांचा आदर्श पुरस्काराने उचित सन्मान होणे आवश्यकच आहे. दरवर्षी २४ एप्रिलला होणाºया पंचायत राज दिनी जिल्हा परिषदेतील उत्कृष्ट कर्मचाºयांचा गौरव व्हावा, यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी दिले़जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद आदर्श कर्मचारी पुरस्कारांचे वितरण अध्यक्षा विखे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपाध्यक्षा राजश्री घुले, सभापती अजय फटांगरे, रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, राजेश परजणे, अनिल कराळे, शरद नवले, रामभाऊ साळवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे सुभाष कराळे, विकास साळुंखे, किशोर शिंदे, राजू म्हस्के, शिवाजी भिटे, भाऊसाहेब मोरगे आदी उपस्थित होते.माध्यमिक शिक्षण विभागातील कक्ष अधिकारी मल्हारी कचरे, सामान्य प्रशासन विभागातील कार्यालयीन अधीक्षक रामचंद्र वाघ, सार्वजनिक बांधकाम उपविभाग संगमनेर येथील वरिष्ठ सहाय्यक अशोक कदम, पंचायत समिती संगमनेर येथील कनिष्ठ सहाय्यक चेतन चव्हाण, सामान्य प्रशासन विभागातील वाहन चालक संजय बनसोडे, परिचर फैय्याज तांबोळी, पूनम उदावंत यांना त्यांच्या कुटुंबीयांसह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात अधिकाºयांसह कर्मचाºयांनीही उत्कृष्ट कला सादर करुन उपस्थितांची मने जिंकली़अधिकारी, कर्मचाºयांनी आपले कर्तव्य बजावताना आपल्यातील कलागुण, छंद यासाठीही आवर्जून वेळ द्यावा़ त्यामुळे त्यांच्या कामाचा गुणात्मक दर्जा आणखी वाढण्यास मदत होईल, असे विखे म्हणाल्या़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद