शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

कोरोनाबाधित रूग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह; बाधितांची प्रकृती उत्तम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:11 IST

सर्वप्रथम कोरोनाबाधीत झालेल्या ज्या रूग्णामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. त्या रूग्णाबाबत आता दिलासादायक बातमी आली आहे. सात दिवसांनंतर त्या रूग्णाचा ‘एनआयव्ही’कडे पाठविलेला अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पुन्हा दुसरा स्त्राव नमुना तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तोही निगेटिव्ह आला तर हा रूग्ण कोरोनामुक्त होण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. 

अहमदनगर : सर्वप्रथम कोरोनाबाधीत झालेल्या ज्या रूग्णामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. त्या रूग्णाबाबत आता दिलासादायक बातमी आली आहे. सात दिवसांनंतर त्या रूग्णाचा ‘एनआयव्ही’कडे पाठविलेला अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पुन्हा दुसरा स्त्राव नमुना तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तोही निगेटिव्ह आला तर हा रूग्ण कोरोनामुक्त होण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, पुण्याला तपासणीसाठी पाठवलेल्या कोरोना संशयितांच्या स्त्रावाचे २५ अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. ते सर्व निगेटिव्ह आढळले. आतापर्यंत जिल्ह्यातील १५५ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ७५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. त्या सर्वांना त्यांच्या घरी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत. तर ७८ जणांचे अहवाल येणे बाकी असून त्यांना जिल्हा रुग्णालय तसेच इतर रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहेत. त्यांची प्रकृती चांगली आहे. शुक्रवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोरोनाच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे उपस्थित होते. पालकमंत्र्यांचे आवाहन आरोग्य सुविधांसाठी आणि खासकरुन व्हेंटिलेटर खरेदीसाठी जिल्हा नियोजन निधीतून खर्च करण्यास मान्यता दिल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर न पडता कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडावी. कोणत्याही परिस्थितीत हे संकट आणखी वाढणार नाही, याची काळजी प्रत्येक जिल्हावासियांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.प्रशासनाला सहकार्य करा: थोरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंशिस्त पाळा, गर्दीत बाहेर जाणे टाळा. परदेशातून कोणी व्यक्ती परत आला असेल तर त्याची माहिती जिल्हा यंत्रणेला द्यावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. त्यांनी शुक्रवारी नगर शहरात प्रशासनाची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक उपस्थित होते. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात