शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

पाणलोटात मुसळधार

By admin | Updated: August 3, 2016 00:16 IST

राजूर/अकोले : अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासह अनेक गावांना अतिवृष्टीचा तडाका बसला असून, भंडारदरा पाणलोटातील रतनवाडी येथे विक्रमी

राजूर/अकोले : अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासह अनेक गावांना अतिवृष्टीचा तडाका बसला असून, भंडारदरा पाणलोटातील रतनवाडी येथे विक्रमी १९ इंचाहून अधिक पाऊस पडला. यासह गेल्या दहा वर्षांपूर्वीचे रेकॉर्डही ब्रेक झाले आहे. सोमवारी सायंकाळपासून पश्चिम पट्टयातील जनजीवन विस्कळीत झाले आहे दिवसभर कोसळत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील ठिकठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. अतिवृष्टीच्या या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी शेतजमिनीचे नुकसान झाले असून दिवसभरात पडत असलेल्या धुवाँधार पावसामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरण ८५ टक्के भरले आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत धरण भरण्याची शक्यता आहे. हरिश्चंद्रगड परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुळा नदीला मोठा पूर आला आहे तर तालुक्यातील इतर नद्याही दुथडी भरून वाहत आहेत सोमवारी सायंकाळपासून भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोटात मुसळधार पावसाच्या सरी कोसळू लागल्या. रात्रभरात तर या पट्ट्यात पावसाचे तांडवच सुरु झाले आणि परिसराला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला. या पावसामुळे ओढ्यानाल्यांनाही दिवसभर पूर होता. रतनवाडी खालोखाल घाटघर येथेही १२ इंच म्हणजेच २९९ मि.मी पावसाची नोंद झाली. यामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यातही विक्रमी वाढ होत आहे. सोमवारी सायंकाळी सहा ते मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंतच्या बारा तासांत ८७० द.ल.घ.फू नव्याने पाणी आले. मंगळवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या बारा तासांत १ हजार २१३ द.ल.घ.फू पाणी नव्याने आले. म्हणजे चोवीस तासांत तब्बल २ हजार ८३ द.ल.घ.फू नवीन पाणी आले आणि पाणीसाठा सायंकाळी सहा वाजता ९ हजार ३६८ द.ल.घ.फू इतका झाला. अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे सर्व परिसर जलमय झाला असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांतील शिखर स्वामिनी कळसूबाईच्या परिसरातही अतिवृष्टीचा तडाका बसला यामुळे प्रवरेची उपनदी कृष्णावंतीबरोबरच ओढ्यानाल्यांनाही मोठा पूर आलेला आहे. त्या बरोबरच भंडारदरा पाणलोटाच्या खालच्या पट्टयातही धुवाँधार पाऊस होत असल्यामुळे रंधा येथील धबधब्यालाही विक्राळ रूप आले आहे. यामुळे निळवंडे धरणातील पाणीसाठ्यातही वेगाने वाढ होत पाणीसाठा सुमारे ५०% च्या जवळ पोहचत तो ४ हजार ३६ द.ल.घ.फू झाला. मुळा खोऱ्यातील आजोबा पर्वताच्या परिसरातील हरिश्चंद्र पट्टयातही दिवसभर धुवाधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. सायंकाळी सहा वाजता लहीत येथील मुळेचा विसर्ग तब्बल ५६ हजार ७६ क्युसेक इतका झाला होता. सायंकाळी सहा वाजता मुळा धरणातील पाणीसाठा १५९४० दलघफू झाला होता.(प्रतिनिधी)