शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

भानसहिवरे येथील शेतकरी उसाच्या शेतीतून बनला शास्त्रज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 14:36 IST

पायजमा, नेहरू शर्ट, डोक्यात टोपी अन् गळ्यात उपरणे अशा पोषाखातील शेतकरी गेल्या १६ वर्षापासून ऊस शेतीवर संशोधन करीत आहे. साधे राहणीमान असलेल्या व्यक्तिमत्त्वाने ८६०३२ या वाणावर संशोधन करून इशुदंडू ज्ञानेश्वर-१६ हा उसाचा वाण तयार केला आहे.

भाऊसाहेब येवलेराहुरी : पायजमा, नेहरू शर्ट, डोक्यात टोपी अन् गळ्यात उपरणे अशा पोषाखातील शेतकरी गेल्या १६ वर्षापासून ऊस शेतीवर संशोधन करीत आहे. साधे राहणीमान असलेल्या व्यक्तिमत्त्वाने ८६०३२ या वाणावर संशोधन करून इशुदंडू ज्ञानेश्वर-१६ हा उसाचा वाण तयार केला आहे. निसर्गातील होणाऱ्या बदलाचा आधार घेत ज्ञानेश्वर निसर्ग केंद्रीत पीक संशोधन केंद्रात तयार केलेल्या वाणाने राज्यभर नावलौकिक मिळविला आहे. मूळ वाणातील दोष घालवून शेतकºयांना दर्जेदार वाण भानसहिवरे येथील शेतकरी विश्वनाथ चव्हाण यांनी दिले आहे.चार्लस् डार्वीन यांच्या उत्क्रांतीवाद सिध्दांताचा विश्वनाथ चव्हाण यांनी अभ्यास केला. १६ वर्षाच्या अथक प्रयत्नातून १६ उतीत परिवर्तन करण्यात आले. देशातील संशोधन कें द्रात संशोधन झाल्यानंतर विविध जाती शेतक-यांच्या शेतावर येतात़ दोन वर्षानंतर शेतक-यांना त्याचे फायदे तोटे समजतात. शेतक-यांच्या फायद्याच्या दृष्टीने विश्वनाथ चव्हाण यांनी ८६०३२ या वाणातील असलेले दोष घालविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यातून तयार झालेला परिपूर्ण ज्ञानेश्वर-१६ हा वाण वरदान ठरत असल्याचे आढळून येत आहे.केवडा रोग येत असे. तो घालविण्यात विश्वनाथ चव्हाण यांना यश आले आहे. गवताळ वाढ सुरूवातीला होत असे. तो दोषही संशोधनातून दूर करण्यात आला. पडणारी काळी कानी दोष दूर करण्यात यश आले. तुरा येत होता तो दोष घालविला. संशोधनातून विश्वनाथ चव्हाण यांना आढळले की, २५ महिन्यात देखील उसाला तुरे आले नाहीत. कांड्याला कॅ्रक पडत असे़ कॅ्रक पडण्याचाही दोष घालविण्यात आला़ उसाच्या पानाची जाडी व रूंदी वाढविण्यात यश आले़ दर्जेदार उसातून दर्जेदार रसाची निर्मिती करणे शक्य झाले. साडेबारा टक्क्यावरून उतारा १४ टक्क्यांवर नेण्यात चव्हाण यांना यश आले आहे.एका डोळ्यापासून तयार झालेल्या उसाला ३० ते ४० फुटवे निर्माण करणे विश्वनाथ चव्हाण यांना अथक प्रयत्नातून शक्य झाले आहे. रासायनिक खताचा वापर न करता उसाचे उत्पादन ६० टनावरून १६३ टनापर्यंत नेण्यात चव्हाण यांना यश आले आहे. चव्हाण यांना पंजाबराव कृषिरत्न पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहे. शंभरपेक्षा अधिक गौरवपत्रही मिळाले आहे. कृषी विद्यापीठ, ऊस संशोधन केंद्र व साखर कारखान्यांनीही चव्हाण यांच्या संशोधनाची दखल घेतली आहे़ केवळ ऊस संशोधनावरच विश्वनाथ चव्हाण थांबलेले नाहीत. त्यांनी रामफळ, पपई, गिन्नी ग्रास, लसून घास आदी १३ पिकांवर संशोधन केले आहे़ राज्यभरातील शेतक-यांना हवे असलेले वाण उपलब्ध करून दिले आहेत. वयाच्या पासष्टीतही विश्वनाथ चव्हाण यांचे शेतक-यांसाठी सुरू असलेले संशोधन प्रेरणादायी आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी