शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पालकांना खुणावतेय मराठी शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 17:45 IST

जून महिना उजाडला, आता सर्वांना मुला- मुलींच्या शाळा प्रवेशाचे वेध लागले आहेत. गावोगावी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहे.

पोपट धामणेजून महिना उजाडला, आता सर्वांना मुला- मुलींच्या शाळा प्रवेशाचे वेध लागले आहेत. गावोगावी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहे. सदर शाळेचे शिक्षक-कर्मचारी रोज घरी येऊन मुलांचा प्रवेश घेण्याबाबत विनवण्या करताहेत . प्रवेश घ्यावा की नाही याबाबतीत पालकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. अशा परिस्थितीत कोणी तरी उत्तम सल्ला द्यावा असे पालकांना वाटते म्हणूनच हा पत्र प्रपंच...मूल ज्या मातेच्या पोटी जन्म घेते तिची बोलण्याची जी भाषा असते ती त्या बाळाची मातृभाषा असते. गर्भावस्थेत पाचव्या महिन्यानंतर बाळाची हालचाल सुरु होते. आई एकांतात आपल्या बाळाशी खूप हितगुज करीत असते. आईचे ते प्रेमाचे बोल बाळाने आत्मसात केलेले असतात. श्रवण व अक्षर, शब्द उच्चारण कौशल्ये विकसित होईपर्यंत ते बोलू शकत नाही. जसजसे ही कौशल्ये विकसित होतात तसतसे सर्वात आधी आईच्या सूचनांचा ते स्वीकार करते आणि बोलू लागते. म्हणजेच त्याने आईची भाषा स्वीकारलेली असते. म्हणूनच मातृभाषेतून शिक्षण हा विचार मोठमोठ्या शिक्षण तज्ज्ञांनी मान्य केला आहे. आता राहिला प्रश्न इंग्रजीचा. पालकांना असे वाटते की आपल्या पाल्याला फाडफाड इंग्रजी आले पाहिजे. ज्या घरातले पालक व परिसरातले लोक हे सातत्याने इंग्रजीतून बोलतात तेथेच हे शक्य होऊ शकते. घरी आई -वडील- भाऊ -बहीण, बाहेर मित्र- मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी असे सारे मराठीतून वा मातृभाषेतून बोलतात. शाळेत गेले की मारून मुटकून प्रसंगी कठोर शिक्षा करून इच्छा नसताना इंग्रजी बोलण्याला भाग पाडले जात. ऐकावे कोणाचे अशी मुलांची अवस्था होते .आता राहता राहिला प्रश्न मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा. इंग्रजी शाळेत शिकल्यानेच मुलाची प्रगती होते, हे साफ खोटे आहे. मुळात मुलाची प्रगती झाली की नाही याचा इंग्रजीचे अवाक्षर न समजणाऱ्या ग्रामीण भागातील पालकांना अंदाजच येत नाही. यादरम्यान त्याच्या आयुष्याची प्रगती करण्याची महत्वाची काही वर्षे वाया जातात. मातृभाषेतून शिकलेल्यांपैकी वानगी दाखल सांगायचे तर महात्मा गांधी, लोकमान्य टिळक,लोकसभेचे पहिले सभापती गणेश मावळणकर, विधानसभेचे सभापती बाळासाहेब खेर, बनारस विश्व हिंदू विद्यापीठातून शिक्षण घेतलेले डॉ. जयंत नारळीकर, शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर , महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, महा संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर अशी कितीतरी नावे सांगता येतील. हे मान्यवर मातृभाषेत शिकूनच उच्च पदावर पोहोचले आहेत. त्यामुळे शेजारचा करतोय म्हणून मीही करतोय हा विचार सोडून द्या. शिक्षण म्हणजे केवळ दोन चार वर्षांचा खेळ.

एका मुलाला उत्तम शिक्षण द्यायचे तर त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. मुलाला इंग्रजी माध्यमातून शिकवायचे तर त्यासाठी लागणारे भरमसाठ शुल्क, हजारो रुपयांचे डोनेशन द्यायची तयारी असावी लागते. शिवाय पैसे देऊन होमवर्कच्या नावाखाली मुलांची व पालकांची होणारी दमछाक वेगळीच. हे सर्व पाहता मुलाला इयत्ता दहावीपर्यंत मातृभाषेतूनच शिकू द्यावे. नाहीतरी आता इयत्ता पहिलीपासून इंग्रजी ही तृतीय भाषा म्हणून सोबतीला आहेच. पाचवीपासून त्याला सेमी इंग्रजी माध्यम निवडता येईल. मातृभाषेबरोबरच इंग्रजीचाही अधिक अभ्यास होईल. मुलाच्या प्रगतीत अडथळाही येणार नाही. चीन, जपानसारखे अतिश्रीमंत देश आजही जागतिक संवादासाठी इंग्रजीऐवजी मातृभाषेतून बोलण्याचाच आग्रह धरतात. भारतात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, साने गुरुजी, अनुताई वाघ, गिजुभाई बधेका अशा अनेकांनी मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरला. त्यांच्या विचारांना हरताळ फासणाºया व शिक्षणाचा बाजार करू पाहणाºया धंदेवाईकांचे इंग्रजी शाळांचे पीक जोमात फोफावले आहे . पाल्याच्या उत्तम प्रगतीसाठी त्याला सुरुवातीची काही वर्षे मातृभाषेतून शिकू द्या. पुढे त्याचा अध्ययन स्तर पाहून माध्यम बदलण्याचे स्वातंत्र्य त्यालाच द्या .मग पहा मुलाच्या प्रगतीचा वारू कसा वेगाने धावतो ते.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcollegeमहाविद्यालय