शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

टँकरच्या निविदेबाबत प्रशासन मांडणार म्हणणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 12:29 IST

यावर्षी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या टँकरच्या निविदा प्रक्रियेबाबत जिल्हा प्रशासन मंगळवारी (दि. २) उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आपले म्हणणे मांडणार आहे.

अहमदनगर: यावर्षी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या टँकरच्या निविदा प्रक्रियेबाबत जिल्हा प्रशासन मंगळवारी (दि. २) उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आपले म्हणणे मांडणार आहे. जुन्या निविदा नवीन दराने मंजूर केल्याने या निविदांच्या वैधतेला आव्हान दिले गेले आहे.जिल्हा प्रशासनाने राबविलेली टँकरची निविदा प्रक्रिया कायदेशीर कचाट्यात सापडली आहे. प्रशासनाने आॅक्टोबरमध्ये टँकरसाठी निविदा मागविल्या होत्या. या निविदा जुन्या दराने सादर झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर शासनाने डिसेंबरमध्ये राज्यभर टँकरच्या दरात वाढ केली. नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने जुन्या निविदा रद्द न करता नव्या दराने त्या मंजूर केल्या. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र जुन्या निविदा रद्द करुन नव्याने निविदा प्रक्रिया राबविली होती. ‘लोकमत’ने ही बाब निदर्शनास आणली आहे. नगरच्या निविदा प्रक्रियेला आक्षेप घेतला गेला असून जनहित याचिका दाखल झाली आहे. प्रशासनाने जुन्या निविदा नवीन दराने मंजूर करणे ही बेकायदेशीर बाब असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याबाबत बुधवारी सुनावणी झाली. पुढील सुनावणी आता मंगळवारी होणार आहे. न्यायमूर्ती पी.बी. वराळे यांच्यासमोर ही सुनावणी सुरु आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद